गुरुवार, २४ मे, २०१२

माझी पण एक (पाडीव) कविता (काव्यरस - टिंगल)




बळेच शब्दा वेठीस धरूनी भाव नाना वाकवितो
असामान्य वा असो अमान्य बसुनी कविता कवि वितो

बुध्दीची मम झेप नवी ही नेते बरं का दिगंतरी
पाहून तिजला भरेल धडकी प्रिय मित्रा तव हृदंतरी

ग्रहगोलांची अगणित सूत्रे अणुरेणूंची पण तशीच ती
विश्वाच्या व्यापाहून भयंकर जीवघेण्या त्या मात्रांची

रे प्रिय मित्रा हितगुज करण्या मार्ग नवा मी अनुसरला
झटापटीने कविता करता शुद्ध कशाची नुरे मजला

व्याकरणाची फिकीर नसे पण प्रासासाठी व्याकुळता
काकुळतीने पणास लावी पणजोबांचे(*) पुण्य आता



* माझे पणजोबा कै. विठ्ठल सीताराम गुर्जर हे मराठीतले जुन्या पिढीतील नामवंत साहित्यिक होते. कै. राम गणेश गडकर्‍यांचे ते जीवश्च कंठश्च मित्र. गडकर्‍यांच्या 'एकच प्याला' या नाटकातील पदे आणी प्रस्तावना गुर्जरांची आहेत.

मंगळवार, २२ मे, २०१२

भाकिताचा पुन्हा पडताळा

मी खाली दिनांक २९ ०४ २०१२ रोजीच्या नोंदीमध्ये ग्रहणाच्या कालावधीमध्ये मोठ्या आपत्तीचे भाकित केले होते. ते इटलीच्या भूकंपाने खरे ठरले होतेच. त्यात आणखी एका आपत्तीची भर पडली आहे. ही आपत्ती म्हणजे आंध्रात झालेला रेल्वे अपघात.

या शिवाय बल्गेरीयात आणखी एका भूकंप (५.८ रिश्टर स्केल) आजच झाल्याचे वृत्त आहे. http://www.google.com/hostednews/afp/article/ALeqM5gWUuOg2nQhkEusTJyHShLu47T-Tg?docId=CNG.083833085acfb87a2eafecefbd831ed9.4f1

रविवार, २० मे, २०१२

भाकिताची प्रचिती - इटलीतील भूकंप




मी आजच्या सूर्यग्रहणा विषयी खाली केलेल्या भाकिताचा पुन्हा एकदा पडताळा आला आहे. मी खाली मोठ्या भूकंपाचे भाकित केले होते. रिश्टर स्केल्वर ६ इतक्या तीव्रतेचा इटलीत असा भूकंप झाल्याची बातमी आहे.  पाच जण दगावल्याचा बातमीत उल्लेख असून अनेक ऐतिहासिक वास्तूना या भूकंपामुळे हानी पोचली आहे.

ज्योतिष परिपूर्ण शास्त्र नाही म्हणून मला भूकंपाची जागा आणि तीव्रता अचूक सांगता आली नाही. पण मी सांगितलेल्या कालावधित आणि नेमकी वर्तवलेली घटना घडली आहे, हे कुणीही नाकारु शकणार नाही.