शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०१६

जलतैल न्याय


तेल आणि पाणी एकत्र करून कितीही घुसळले तरी तेल, तेल राहते आणि पाणी, पाणीच राहते. ते एकजीव होऊ शकत नाहीत. हा दृष्टांन्त सांगायचे कारण म्हणजे आय आय टीवर लादलेले आरक्षण. या लादलेल्या आरक्षणाचे परिणाम तपासायचे कष्ट कुणी घेतले आहेत असे दिसत नाही.

चार्वीच्या  (माझ्या मुलीच्या) एका मित्राला आणि आमच्या एका परिचितांच्या मुलाला आय आय टीत प्रवेश (जनरल प्रवर्ग) मिळाला आहे. त्यांच्याकडुन आरक्षणातुन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या हकिकती समजतात, तेव्हा समाजातील काही घटकांवर **प्रगती लादण्याने** काय साधले जात आहे याचा जमाखर्च मांडायची गरज आहे, असे वाटते.

इथे सविस्तर वृतांत देणे शक्य नाही पण आरक्षणातुन आलेल्याना मिळालेल्या संधीची किंमत न कळणे, जबाबदारीचे भान नसणे आणि त्यातुन येणारा बेजबाबदारपणा आणि नैराश्य हे प्रमुख प्रश्न आहेत. त्यातुन ही मुले (आरक्षण) ज्यांना अभ्यास करायचा आहे, त्यांना पण अभ्यास करू देत नाहीत, असे कानावर आले आहे. याचा मुख्य परिणाम म्हणजे वर्गभेदाला मूठमाती मिळण्या ऐवजी तो अधिक प्रखर बनल्याने, आय आय टी सारख्या संस्थांचे नुकसान जास्त होणार आहे.

anyone listening?