रविवार, ३० नोव्हेंबर, २००८

सुसंस्कृत भारतीय

मला कधि कधि स्वत:ला भारतीय म्हणवून घ्यायची लाज वाटते. तुम्हाला नक्कीच
प्रश्न पडेल की हा असा का बोलतो आहे.

मी पुण्यात जीथे राहतो तिथे जवळच ३-४ मंगल कार्यालये आहेत. मी हा मजकूर लिहीत
असताना रस्त्यावर एका लग्नाची एक वरात वाजत गाजत चालली आहे. अधूनमधून
फटाक्यांचे मोठे सर लावले जात आहेत. कुण्या धनदांडग्याच्या घरचा हा विवाह सोहळा
असावा. जणू काही घडलेच नाही असा माहोल आहे. शहाण्या लोकांना मला काय म्हणायचे
ते आता कळले असावे.

देशावर एवढे मोठे संकट कोसळले. प्राणहानी, वित्तहानी झाली त्याचे यत्किंचितही
दू:ख या मिरवणूकीतल्या लोकांना नाही. कदाचित दहशतवादी मारले गेले याचा आनंद या
वर्‍हाडीना झालेला असावा. पण या निर्बुद्ध लोकाना हे कळत नाही की दहशतवादी
मारले म्हणजे दहशतवाद मारला गेला असे नाही.

लग्नसमारंभ स्थगित करणे शक्य नाही हे समजू शकते पण तो साधेपणाने साजरा करण्याची
बुद्धी या लोकांना हिदूंच्या तेहतीस कोटी देवांपैकी एकाही देवाने दिली नाही हे
दूर्दैव.

काही वर्षापूर्वी दिवाळीत कोकणात गेलो होतो. मी ज्या कुटुम्बात उतरलो होतो त्या
कुटुम्बात दिवाळीची कोणतीही धामधूम नव्हती म्हणून मी आडून चवकशी केली. तेव्हा
असे कळले की नुकतेच शेजारच्या घरातल्या कर्त्या व्यक्तीचे अचानक निधन झालेले
होते. खेड्यातल्या अडाणी लोकांकडे जी संवेदनशीलता दिसली ती सुसंस्कृत
म्हणवणार्‍या भारतीय समाजात नक्कीच नाही. तसं असतं तर निदान १३ दिवस तरी
रस्त्यावर लग्नाच्या वाजतगाजत मिरवणूका या देशात निघणार नाहीत.

३ टिप्पण्या:

अनिकेत वैद्य म्हणाले...

राजीव,
मी आपल्या मताशी सहमत आहे. आपण ( आपला समाज) सुशिक्शीत झाला तरिही अजून सुसंस्क्रूत झाला नहिये.
मी सुद्धा रोज हेच द्रुश्य बघतोय. पण, हताशपणे पघण्याशिवाय काहीच करू शकत नाही.

आपला,
(दु:ख्खी)अनिकेत वैद्य.

Sunshine म्हणाले...

Rajeev,
Aaplya matashi sahmat.
evdech nahi. Durdaiva he aahe ki aapan India ek country manat nahi. Mumbai madhe zale na, mag bakichya states ni kalji karaychi garaz nahi..aaple rakt petun uthatch nahi ki ha bhartavar zalela halla aahe.
Ha vichar karnyasathi, aaple aaplya deshavar prem have, jo manus gela to bhartiya aahe hi janeev manat havi. Pan aaple aaplyatle hevedavech sampat nahit, ha Hyderabadi, Ha Mumbai kar, Ha UP cha..bas aapli buddhi tevdhich chalte.
Aapli eki honar nahi,to paryant he gharbhedi asech ghusnar, eki kade lok marnar aani dusrikade jase kahi zalech nahi chya thatat lok aaple san samarambh sajre karnar.
Ase nagrik milne, bhartache durdaiva aahe.Karan hya goshti koni shikvun yet nahit, tyachi janiv manane zali pahije.

Gauri

Unknown म्हणाले...

Khudd Taj mahal hotel javal ladhai chalu asatana barech lok sahkutumb sahalila aale hote, barich tolaki gaat ani hasat khidalat firat hoti. Bharat Mateche durdaiva, dusare kaay?