गुरुवार, १ डिसेंबर, २०१६

आईस...

आईस,

आज तुझ्याशी खुप बोलावसं वाटतय...

जग आता खूप बदलले आहे आणि तुझ्या मूल्यांची आता पीछेहाट झाली आहे. तू हयात असतीस तर तुला हे पचवता आले असते का? याचे उत्तर आज तरी माझ्याकडे नाही. तुझ्या अखेरच्या दिवसात जगाने मला एक महत्त्वाची गोष्ट शिकवली. ती म्हणजे -

सभ्यपणा हा एकप्रकारचा कमकुवतपणा असतो.


प्रगती हा नात्याच्या यशाचा एक महत्त्वाचा निकष आहे, असे मला वाटते. ज्या मूर्खांनी आपली फक्त भांडणे बघितली, त्यांना हे कळणार नाही की ती कोणत्या परिस्थितीत झाली. तसेच त्या भांडणांमुळे माझी प्रगती थांबली नाही, तर  तुझी काही स्वप्ने पुरी करता आली. समाजाला न्यायाधीशाच्या भूमिकेत बसायची तीव्र हौस असते पण साक्षीपुरावे तपासायची क्षमता आणि इच्छा नसते.

आजकाल मला पंचतंत्रातल्या, यज्ञासाठी बोकड नेणार्‍या ब्राह्मणाला भेटलेल्या ठगांच्या गोष्टीची आठवण करून देणारी माणसे खूप भेटतात. तू हयात असताना सांगितल्याप्रमाणे, "तुझी आई कशी वाईट", हे मनावर बिंबवायचे खूप प्रयत्न झाले. महत्त्वाचे पुरावे हाती लागले नसते तर मला कदाचित "माझी आई वाईट", हे मला स्वीकारणे मला भागच होते. या लोकांचा दिशाभूल करण्यात हातखंडा असतो. अशी माणसे "अर्धा ग्लास भरलेला आहे"  असे मानणार्‍या व्यक्तीला मानसिक रुग्ण ठरवायला कमी करत नाहीत.

बाकी आपल्या गोतावळ्यात ’भानुमतीचा मुलगा’ या ओळखीने मला जी किक् मिळाली आहे, तशी किक् ’कोण्डो विठ्ठल उपाध्यांचा मुलगा’ म्हणुन कधीच मिळाली नाही.

असो. चार्वीने तुझी चेहेरेपट्टी घेतली असल्याने तुझी आठवण तिच्यामुळे सर्वानाच होते आणी राहील. तुझ्या अनेक लकबी तिच्यात कुठुन आल्या हे एक मोठ्ठे कोडे आहे.

जाता जाता - तू कितीही वाईट असलीस तरी मला "अटक" घडवुन आणायचे जे दोन desparate प्रयत्न झाले त्यातुन मी केवळ तू होतीस म्हणून वाचलो, याची जाणीव मला आयुष्यभर राहील.

तुझा

राजीव






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: