मंगळवार, ९ एप्रिल, २०१९

घटना आणि अर्थ



व्यक्तीगत आयुष्यातील असो अथवा सार्वजनिक आयुष्यातील असो, एखादी घटना घडते तेव्हा तिला एक कारणपरंपरा असते. अनेक घटकांनी त्यात आपापली भर घातलेली असते. घटना घडून गेल्यावर जसाजसा काळ लोटायला लागतो तेव्हा त्या घटनेची कारणपरंपरा विरळ अथवा धूसर बनत जाते. या सर्व कारणपरंपरेतील सर्व टप्पे कधीच नोंदले जात नाहीत (भावनिक संदर्भ तर कधीच नाही) आणि मग ते वस्तुनिष्ठतेचे कातडे पांघरलेल्या (सहसा संवेदनाशून्य) चिकित्सकांच्या पथ्यावर पडते. असे चिकित्सक मग उपलब्ध पुरावे त्यांच्या मर्जीप्रमाणे जोडतात आणि हाच खरा इतिहास म्हणुन आपल्या घशात कोंबतात. मग स्वातंत्र्यासाठी जिवावर उदार झालेला एखादा देशभक्त नक्षलवादी ठरतो, तर एखाद्याला माफीवीर म्हणून त्याच्यावर बोळा फिरवला जातो...


घटना घडुन गेल्यावर जसा अधिकाधिक काळ लोटत जातो तसे त्या घटनेचे हवे ते अर्थ लावणे सोईचे जाते. तात्कालीन मूल्यांचा/धारणांचा या अर्थ लावण्यावर कळत नकळत परिणाम झालेला असतोच.

आधुनिक इतिहासकारांचे इतिहास ’अन्वयन’ (interpretation) आणि लेखन किती गांभीर्याने घ्यायचे हा माझ्यापुढे कायम न सुटलेला प्रश्न आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: