रविवार, १३ एप्रिल, २०१४

सध्याचे ग्रहमान



लोक हो,

गेले वर्षभर मी वैयक्तिक प्राधान्यक्रम बदलल्यामुळे माझे ज्योतिषविषय्क ब्लॉग लिखाण बंद ठेवले होते. ते मी आता पुन्हा चालु करणार आहे. याच बरोबर माझे ज्योतिष विषयक लिखाण मी फेसबुकवर पण माझ्या एका समूह-पृष्ठावर प्रसिद्ध करणार आहे. जिज्ञासूनी (https://www.facebook.com/CircularReality) या दूव्यावर क्लिक करुन सदस्यता घ्यावी. हे मराठी किंवा इंग्रजी भाषेतून सोयीनुसार केले जाईल.

आकाशात सतत काही ना काही ग्रह योग सतत चालु असतात. प्रचलित समजुतीप्रमाणे हे योग ज्या राशीमधुन होतात, त्या राशींच्या लोकांना कसे जातील हे स्थूल मानाने सांगितले जाते. पण हे असे सांगितलेले भविष्य अनेकदा चुकते कारण ग्रहयोगांच्या प्रभाव क्षेत्राचा विचार राशीनुसार वर्तवलेल्या भविष्यात केला जात नाही.

एखादा ग्रह-योग आपल्यासाठी महत्चाचा केव्हा मानावा? आपल्या पत्रिकेतील रवि, चंद्र, लग्न आणि ख-मध्य यांचे अंश आणि ग्रहयोगाचे अंश समान असतील तर अनुभवाला येण्याची शक्यता जास्त असते. ग्रहयोगाच्या दर्जानुसार या अंशाच्या अलिकडे आणि पलिकडे काही क्षेत्र या योगांचे प्रभावक्षेत्र मानले जाते. म्हणुन अंश समान किंवा प्रभाव क्षेत्रात असतील तर तो ग्रहयोग आपल्यासाठी महत्त्वाचा मानावा.

तेव्हा माझी नम्र सूचना अशी की ज्यांना आपल्या भविष्यात डोकवायचे आहे त्यानी केवळ आपल्या राशीचे भविष्य न बघता आपल्या पत्रिकेतील रवि, चंद्र, लग्न आणि ख-मध्य यांचे अंश जाणुन घ्यावेत आणि मग एखादे ग्रहयोगाचे भाकीत आपल्यासाठी महत्त्वाचे आहे की नाही ते ठरवावे.

सध्याचे ग्रहमान

गुरु-प्लुटो-हर्षल यांच्यात सायन मेष-कर्क-मकर राशीतुन तयार झालेली टि-स्क्वेअर ही रचना अतिशय शक्तीशाली रचना आहे. ज्यांचे रवि, चंद्र, लग्न आणि ख-मध्य या रचनेत सापडले आहेत. त्यांच्या आयुष्यात मोठे आणि आमुलाग्र बदल सध्या चालु असण्याची शक्यता आहे. हे बदल साडेसाती पेक्षा जास्त त्रासदायक ठरू शकतात.

येत्या १५ तारखेला दोन महत्त्वाचे ग्रह-योग पत्रिकेत होत आहेत

- बुध-हर्षल युती

वर उल्लेख केलेल्या टि-स्क्वेअर या रचनेत बुध पण योगदान करत असल्याने ही रचना अधिक बलवान होते. वर म्हटल्या प्रमाणे आयुष्यात मोठ्या बदलाना ज्याना सामोरे जावे लागत असेल त्यांना अचानक अस्वस्थ करणारी बातमी या ग्रहयोगात ऐकायला मिळु शकते.

- पौर्णिमा (चंद्रग्रहण)

सायन मेष-तूळ राशीतुन २५ अंशावर ही पौर्णिमा होत आहे. याच दिवशी चंद्र-ग्रहण पण आहे. पण पौर्णिमेतील रवी-चंद्रांनी कोणतेही महत्त्वाचे योग केले नसल्याने जन्मपत्रिकेत २५ अंशावर जे ग्रहयोग होत असतील त्याप्रमाणे पौर्णिमेची फले मिळु शकतात.

जाता-जाता

नुकताच यु-ट्युबवर उत्क्रांतीवर एक व्हीडीओ (https://www.youtube.com/watch?v=hOfRN0KihOU&list=UUsXVk37bltHxD1rDPwtNM8Q) बघितला. त्यात कळलेली महत्वाची माहिती माझ्या अंदाजाना पुष्टी देणारी ठरली. नारळीकरांच्या कंपुने ज्योतिषाची चाचणी केली तेव्हा तेव्हा मी तेव्हा मतिमंदत्वाचे भाकीत करायला आई-वडीलांच्या पत्रिका बघायला हव्यात असे मत व्यक्त केले होते. याचे कारण असे की गर्भधारणेच्या काळातील आईवडीलांवरचे ताणतणाव जनुकीय-बदल घडवुन कारणीभूत ठरत असावेत असा माझा कयास होता. आत्यंतिक तणावांनी मेंदुच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतोच पण उतार वयात अल्झायमर सारखे विकार पण जडु शकतात. त्यामुळे गर्भधारणेच्या काळातील काळातील आईवडीलांवरचे ताणतणाव मतिमंदत्वास कारणीभूत ठरत असणार... हे ताणतणाव पत्रिकेत स्पष्ट्पणे दिसतात हे वेगळे सांगावयास नको.

असो. माझी अपेक्षा पूर्ण न झाल्याने मला चाचणीत भाग घेता आला नाही. पण ही चाचणी विश्वासार्ह किती मानायची हा मुद्दा उरतोच...