गुरुवार, ५ मार्च, २०२०

झालं-गेलं


आजकाल अनेकजण अनेकांना "झालं-गेलं विसरुन जा"चा सल्ला देत असतात. ब-याच वेळा ही अपेक्षा एकतर्फी ठेवली जाते. तत्त्वत: झालं-गेलं विसरुन तेव्हाच जाता येतं, जेव्हा निश्चित भविष्यकाळ दिसत असतो आणि तो आपल्या प्रगतीसाठी तसेच आनंदासाठी पुरेसा पोषक असतो (प्रगती आणि आनंद हे दोन महत्त्वाचे निकष आहेत). प्रत्यक्षात माणसांच्या स्वभावाचे पीळ काही झालं तरी सुटत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये झालं-गेलं विसरून जाणं हा पायावर धोंडा पाडून घेणे असते... मुळात एखादी गोष्ट विसरणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, आणि त्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करावे लागते. विसरणे कोणत्याही दबावाखाली घडून येत नाही, हे ब-याच मूर्खाना कसं कळत नाही हे एक कोडे आहे.

तरी पण मला जेव्हा "झालं-गेलं विसरून जा"चा सल्ला मिळतो, तेव्हा त्या व्यक्तीला मला एक प्रयोग सुचवासा वाटतो. तो प्रयोग असा- मी त्या सुचवणा-या व्यक्तीला चारचौघात चपलेने दोन्ही गालांवर एकेक ठेऊन देईन आणि मग "झालं गेलं विसरून जाऊया"ची ऑफर करेन. आहे मान्य?

या टप्प्यापर्यंत प्रयोग व्यवस्थित पार पाडल्यावर काही व्यक्तींची यादी मी त्यांच्याकडे सुपूर्द करेन. या व्यक्तीना एखाद्या चौकात दोन्ही गालांवर दहा मारून एक मोजेन आणि "झालं गेलं विसरून जाऊया"ची ऑफर करेन.

व्यवस्थित प्रात्यक्षिक मिळाले तरं झालं-गेलं विसरून कसं जायचं याचा व्यवस्थित अभ्यास/सराव करता येतो...