सोमवार, २३ नोव्हेंबर, २००९

सुप्त मनातील खजिन्याचा शोध घ्या!

आताच 'उपक्रम' वरील श्री शरद कोर्डे यांचे सृजनशीलतेवरील लिखाण वाचले. तेथे त्यांनी सृजनशीलता जोपासण्या साठी वेगवेगळी तंत्रे सांगीतली आहेत. यात एका तंत्राचा उल्लेख सापडला नाही ज्याचा मी विषेश अभ्यास केला आहे. हे तंत्र म्हणजे नादोपचाराचे तंत्र. यात आपला मेंदू हव्या त्या अवस्थेत नेता येतो. मेंदूच्या या अवस्थांची गॅमा ४० Hz, बीटा (२०-१३Hz), अल्फा (१३-१०), थीटा (१०-४) व डेल्टा (४ - ०) अशी विज्ञानाने सर्वसाधारण वर्गवारी केली आहे. या अवस्थांमध्ये मेंदू वेगवेगळी कार्ये करतो.

सुप्त मनावर असलेली जागृत मनाची पकड ढिली पडली की नवनिर्मिती घडू लागते. माणसाचा मेंदू अल्फा-थीटा अवस्थांमध्ये आंदोलित होतो तेव्हा सुप्त मनात दडलेल्या असंख्य गोष्टी बाहेर येउ लागतात. ज्यांना हा अनुभव घ्यायचा आहे त्यानी http://www.freewebs.com/yuyutsu/musictherapy.htm या लिंक वर जाउन् काही 'फुकट' असलेले ट्रॅक्स ऐकून पहावेत. माझे Inner Voice 1 आणि Alpha Magic हे ट्रॅक्स जगभरातील लोकाना खुप आवडले आहेत. सुप्त मनातील खजिन्याचा शोध घेण्यास ते नक्की उपयोगी पडतील.

हे ट्रॅक्स ऐकताना दिलेल्या सूचना काटेकोर पणे पाळाव्यात...

बुधवार, १४ ऑक्टोबर, २००९

शनीचे सायन तूळ राशीतील भ्रमण

गोचर शनीचे सायन तूळ राशीतील भ्रमण दिनांक २९ ऒक्टोबर २००९ रोजी सुरु होत असून दिनांक ६ ऑक्टोबर २०१२ पर्यंत शनी सायन तूळ राशीत वास्तव्य करणार आहे. थोडक्यात सायन तूळ राशीच्या लोकांना साडेसातीला सामोरे जावे लागणार आहे. वास्तविक ज्यांचा चंद्र सायन तूळ राशीत आहे त्यांनाच केवळ साडेसाती असते असे नाही, तर ज्यांच्या पत्रिकेत रवि, लग्न, ख-मध्य आदि सायन तूळ राशीत आहेत त्यांना पण त्यांना पण कमी अधिक प्रमाणात साडेसाती सारखीच फळे मिळू शकतील. कुटुंबातील जवळच्या व्यक्तींच्या पत्रिकेतील बहिर्ग्रह तुमच्या पत्रिकेतील रवि, चंद्र, लग्न, ख-मध्य आदि बिंदूंशी युती, प्रतियुती, केंद्र, अर्धकेंद्र इत्यादि योग करत असल्यास शनीचे हे भ्रमण विशेष त्रासदायक जाईल.

सायन मिथुन आणि कुंभ राशीमध्ये तुमच्या पत्रिकेतील रवि, चंद्र, लग्न, ख-मध्य आदि बिंदू असतील तर मात्र शनीचे हे भ्रमण स्थैर्य कारक जाण्याची शक्यता जास्त आहे.

एबर्टीन ज्योतिषात राशींना फलाच्या दृष्टीने महत्त्व नसते. पण मध्यबिंदूचा विचार त्यात केला गेला असल्याने फलीताच्या अधिक व्यक्तीनिष्ठ आणि स्पष्ट छटा बघायला मिळतात. नमुन्यादाखल पुढे रविमुळे तयार झालेले आणि गोचर शनीच्या भमणाने सक्रिय झालेले मध्यबिंदू आणि त्यांचे एबर्टीन तंत्रानुसार फलित दिले आहे. '=' हे चिन्ह युति, प्रतियुति, केंद्र आणि अर्ध केंद्र योग दाखवते. पुढे दिलेली सर्व interpretations एबर्टीनच्या COSI मध्ये दिली आहेत.

Saturn = Sun/Moon
Inner inhibitions or repressions, the state of feeling depressed, increasing loneliness, separation from the community, renunciation, difficulties in the relationship with the other sex, joint and shared suffering, illness, separation (divorce).


Saturn = Sun/Mercury
Inhibitions in thinking, a pessimistic attitude to life, a serious outlook on life, life-experience. - Thinking of separation, parting or farewell. Incoherent and erratic thinking, sudden ideas, inventions, a flair for applied science and technology, organisation and reforms. - Adjustment to new circumstances in life.


Saturn = Sun/Venus
Inhibitions within the loving person, sexual inhibitions. - A timid lover, difficult or exacting art-work. - Suffering in love, love-sickness, separation in love.


Saturn = Sun/Mars
Obstructed manifestation of vitality, pessimism, weakness, inactivity. - Difficulties or obstacles in vocation or profession, defeat in a fight or contest, separation. The suffering or worries of the husband.


Saturn = Sun/Jupiter
The disinclination to do something coupled with a completely negative state of mind, incapability and incompetence, inhibitions (partly conditioned organically). - The loss of employment, of good fortune, of one's possessions. - Lack of success illness.


Saturn = Sun/Uranus
Rebellion against limitation of freedom, inhibitions and difficulties are overcome through extraordinary efforts. - Sudden separation, sudden loss, a separation from another person carried out in haste.


Saturn = Sun/Neptune
Inhibitions through illness or physical debility, an emotional affliction. - Illness through mental and emotional suffering, an impeded blood-circulation, bad or unhealthy blood.


Saturn = Sun/Pluto
Ruthless overcoming of obstacles and difficulties, physical impediment. -Restriction, separation (by higher power).


Saturn = Sun/Moon's North Node
Lack of adaptability, reserve (shyness), inhibitions with regard to other people. - Disadvantages in dealings with the public, separations.


Saturn = Sun/Ascendant
Inhibitions, shyness, difficult attainment of recognition. - Difficulties in public life. The sharing of suffering together with others, separations.


Saturn = Sun/Midheaven
A negative outlook on life, the negation of life, reserve, inhibitions. - The tendency to withdraw or to retire, the mood of sadness. The necessity to make grave or difficult decisions.

मंगळवार, १५ सप्टेंबर, २००९

१९ सप्टेंबरची अमावस्या कुणाला कशी?

१९ सप्टेम्बर २००९ रोजी सायन कन्या राशीत अमावस्या २६ अंश २ मि. वर होत आहे. ही अमावस्या गोचर शनीच्या युतीत होत असल्यामुळे, तसेच गोचर प्लुटॊशी केंद्र योग करत असल्याने फलिताच्या दृष्टीने अतिशय महत्वाची ठरणार आहे.

कोणत्याही सालातील खालील जन्म दिनांकाना ही अमावस्या विशेष त्रासदायक ठरायची शक्यता आहे -
१४ जून ते २३ जून
१३ मार्च ते २४ मार्च
१४ डिसेंबर ते २५ डिसेंबर
१५ सप्टेम्बर ते २५ सप्टेम्बर

या अमावस्येने सायन कन्या रास २२ अंश ते साय्न तूळ रास ० अंश हे क्षेत्र प्रभावित केले असल्याने या क्षेत्रात जर इतर कोणतेही ग्रह सापडले असतील तर अशा व्यक्तीना अमावस्येच्या मागेपुढे बराच त्रास संभवतो.

उदाहरणार्थ खाली दिलेल्या जन्मतारखाना (+/- २ दिवस) जन्मलेल्या व्यक्तींचा शुक्र अमावस्येमुळे सक्रिय झालेल्या त्रासदायक ग्रहयोगांमध्ये सापडतो. त्यामुळे या व्यक्तीना अचानक, द्रव्यनाश, कौटुम्बिक कलह, आनंदावर विरजण पडणारे प्रसंग इत्यादीना सामोरे जावे लागेल.

10 Jan 1941 24 Mar 1941 4 Jun 1941 17 Aug 1941 3 Nov 1941
2 May 1942 20 Jul 1942 1 Oct 1942 12 Dec 1942
22 Feb 1943 8 May 1943 5 Nov 1943
25 Jan 1944 7 Apr 1944 19 Jun 1944 31 Aug 1944 13 Nov 1944
29 Jan 1945 1 Aug 1945 16 Oct 1945 27 Dec 1945
8 Mar 1946 21 May 1946 6 Aug 1946
2 Feb 1947 22 Apr 1947 5 Jul 1947 16 Sep 1947 27 Nov 1947
8 Feb 1948 2 May 1948 7 Jul 1948 25 Jul 1948 29 Oct 1948
10 Jan 1949 23 Mar 1949 4 Jun 1949 17 Aug 1949 2 Nov 1949
2 May 1950 19 Jul 1950 1 Oct 1950 12 Dec 1950
22 Feb 1951 7 May 1951 5 Nov 1951
24 Jan 1952 6 Apr 1952 19 Jun 1952 31 Aug 1952 12 Nov 1952
29 Jan 1953 31 Jul 1953 15 Oct 1953 26 Dec 1953
8 Mar 1954 20 May 1954 5 Aug 1954
2 Feb 1955 21 Apr 1955 4 Jul 1955 15 Sep 1955 27 Nov 1955
8 Feb 1956 2 May 1956 30 Jun 1956 28 Jul 1956 28 Oct 1956
9 Jan 1957 22 Mar 1957 3 Jun 1957 16 Aug 1957 2 Nov 1957
2 May 1958 19 Jul 1958 30 Sep 1958 11 Dec 1958
21 Feb 1959 7 May 1959 5 Nov 1959
24 Jan 1960 6 Apr 1960 18 Jun 1960 30 Aug 1960 12 Nov 1960
29 Jan 1961 31 Jul 1961 15 Oct 1961 26 Dec 1961
7 Mar 1962 20 May 1962 5 Aug 1962
2 Feb 1963 21 Apr 1963 4 Jul 1963 15 Sep 1963 26 Nov 1963
7 Feb 1964 3 May 1964 24 Jun 1964 30 Jul 1964 28 Oct 1964
9 Jan 1965 22 Mar 1965 3 Jun 1965 16 Aug 1965 2 Nov 1965
1 May 1966 18 Jul 1966 30 Sep 1966 11 Dec 1966
20 Feb 1967 7 May 1967 5 Nov 1967
23 Jan 1968 5 Apr 1968 18 Jun 1968 30 Aug 1968 11 Nov 1968
29 Jan 1969 30 Jul 1969 14 Oct 1969 25 Dec 1969
7 Mar 1970 19 May 1970 4 Aug 1970
2 Feb 1971 20 Apr 1971 3 Jul 1971 14 Sep 1971 26 Nov 1971
7 Feb 1972 4 May 1972 18 Jun 1972 31 Jul 1972 27 Oct 1972
8 Jan 1973 21 Mar 1973 2 Jun 1973 15 Aug 1973 2 Nov 1973
1 May 1974 18 Jul 1974 29 Sep 1974 10 Dec 1974
20 Feb 1975 6 May 1975 5 Nov 1975
23 Jan 1976 5 Apr 1976 17 Jun 1976 29 Aug 1976 11 Nov 1976
29 Jan 1977 30 Jul 1977 14 Oct 1977 25 Dec 1977
6 Mar 1978 19 May 1978 4 Aug 1978
2 Feb 1979 20 Apr 1979 3 Jul 1979 14 Sep 1979 25 Nov 1979
6 Feb 1980 5 May 1980 12 Jun 1980 1 Aug 1980 27 Oct 1980
8 Jan 1981 21 Mar 1981 2 Jun 1981 15 Aug 1981 1 Nov 1981
1 May 1982 17 Jul 1982 29 Sep 1982 9 Dec 1982
19 Feb 1983 6 May 1983 5 Nov 1983
22 Jan 1984 4 Apr 1984 17 Jun 1984 29 Aug 1984 10 Nov 1984
29 Jan 1985 30 Jul 1985 13 Oct 1985 24 Dec 1985
6 Mar 1986 18 May 1986 4 Aug 1986

ज्यांच्या जन्म पत्रिकेत मंगळ अमावस्येमुळे सक्रिय झालेल्या त्रासदायक ग्रहयोगांमध्ये सापडतो त्या जन्म तारखा (+/- ३ दिवस) पुढे दिल्या आहेत. त्यामुळे या व्यक्तीना वैफल्य, अडथळे, अपघात, आजारपण इत्यादी कटकटीना तोंड द्यावे लागेल.

29-Sep-1940
12-Feb-1941 25-Jun-1941
19-Apr-1942 11-Sep-1942
21-Jan-1943 22-May-1943
20-Mar-1944 23-Aug-1944 31-Dec-1944
27-Apr-1945 1-Sep-1945
3-Aug-1946 12-Dec-1946
7-Apr-1947 8-Aug-1947
10-Jul-1948 21-Nov-1948
17-Mar-1949 17-Jul-1949 16-Dec-1949
8-Apr-1950 30-May-1950 1-Nov-1950
25-Feb-1951 28-Jun-1951 17-Nov-1951
6-Oct-1952
3-Feb-1953 8-Jun-1953 26-Oct-1953
2-Apr-1954 21-Jul-1954 6-Aug-1954
9-Jan-1955 20-May-1955 7-Oct-1955
23-Feb-1956 28-Nov-1956
28-Apr-1957 18-Sep-1957
29-Jan-1958 1-Jun-1958
3-Apr-1959 31-Aug-1959
9-Jan-1960 6-May-1960 13-Sep-1960
10-Aug-196119-Dec-1961
14-Apr-1962 16-Aug-1962
20-Jul-1963 30-Nov-1963
24-Mar-1964 25-Jul-1964
10-Jan-1965 15-Feb-1965 21-Jun-1965 9-Nov-1965
4-Mar-1966 5-Jul-1966 26-Nov-1966
17-Oct-1967
12-Feb-1968 15-Jun-1968 2-Nov-1968
14-Sep-1969
19-Jan-1970 27-May-1970 14-Oct-1970
6-Mar-1971 20-Dec-1971
6-May-1972 25-Sep-1972
6-Feb-1973 15-Jun-1973
13-Apr-1974 6-Sep-1974
16-Jan-1975 16-May-1975 4-Oct-1975 7-Dec-1975
9-Mar-1976 18-Aug-1976 26-Dec-1976
22-Apr-1977 25-Aug-1977
29-Jul-1978 7-Dec-1978
2-Apr-1979 2-Aug-1979
3-Jul-1980 17-Nov-1980
12-Mar-1981 12-Jul-1981 8-Dec-1981
26-Oct-1982
20-Feb-1983 23-Jun-1983

11-Nov-1983
29-Sep-1984
28-Jan-1985 3-Jun-1985 21-Oct-1985

शुक्रवार, १४ ऑगस्ट, २००९

एबर्टीन ज्योतिष आणि स्वाईन फ्लु

एबर्टीन ज्योतिष आणि स्वाईन फ्लु

एका याहूग्रुपवर एका ज्योतिषनिंद्काने प्रश्न विचारला की ज्योतिषांनी स्वाईन फ्लुचे भविष्य का वर्तवले नाही. हा प्रश्न मला उद्देशून असावा कारण मी त्या ग्रुपवरील ज्योतिषाचा खंदा समर्थक आहे. वास्तविक ऑक्टोबर २००८ मध्ये लिहिलेल्या एका टिपणात मी जे ग्रहयोगांचे वर्णन केले आहे, ते जिज्ञासूनी येथे http://rajeev-upadhye.blogspot.com/2008/10/blog-post.html अवश्य वाचावे.

आधुनिक ज्योतिष (विशेषत: एबर्टीनचे तंत्र) एखाद्या घटनेतील core issues (स्थायीभाव) चे भाकीत वर्तवण्यास कसे उपयोगी पडते हे यावरून समजून घेता येईल. 'अस्थैर्य' हे हर्षल आणि शनीच्या योगात दिसून येते. 'अनपेक्षित' हा एकच शब्द हर्षलचे वर्णन करण्यास पाश्चात्य ज्योतिषी पुरेसा मानतात. शनी-हर्षलच्या प्रतियोगात आपण वेगवेगळ्या प्रकारचे 'अनपेक्षित अस्थैर्य' अनुभवत आहोत. प्रथम आर्थिक मंदी, मग २६ नोव्हेंबरचे अरिष्ट आणि आता स्वाईन फ्लु मला वाटतं ज्योतिषाची उपयुक्ततता पटण्यास हा अनुभव पुरेसा आहे.

'स्वाईन फ्लूची साथ" येईल असे शब्द माझ्या भाकीतात नाहीत असा आक्षेप काही नतद्र्ष्ट ज्योतिषाचे निंदक घेतील. त्याचे स्पष्टीकरण असे -

- माझ्या ज्योतिषाच्या अभ्यासाच्या वैयक्तिक मर्यादा
मी साथीच्या रोगांचा आणि ज्योतिषाचा संबंध अभ्यासलेला नाही. ज्योतिषाचा सर्वसमावेशक अभ्यास एका व्यक्तीस तिच्या एका आयुष्यात शक्य नाही.

- मी जे तंत्र (एबर्टीन) वापरतो त्याची मर्यादा
वर अगोदरच म्हटल्या प्रमाणे एबर्टीनचे तंत्र एखाद्या घटनेतील फक्त core issues (स्थायीभाव) चे भाकीत वर्तवण्यास उपयोगी पडते. ग्रहयोगांच्या सक्रियतेच्या कालावधीत ज्या मोठ्या घटना घडल्या त्यांचा स्थायीभाव तो माझ्या भाकितात अचूकपणे आला आहे. एबर्टीन तंत्राच्या मूळ दाव्याशी हे सुसंगत आहे असे मला वाटते.

जाता जाता स्वाईन फ्लूच्या साथी मध्ये कुणी विशेष काळजी घ्यायची त्यासंबंधी सूचना -

ज्यांच्या पत्रिकेत शनी आणि नेपच्युन angular आहेत म्हणजे लग्न आणि दशमभाव आरंभ बिंदूशी युती करत आहेत किंवा जन्मरवीशी युती, प्रतियुती, केंद्र अर्धकेंद्र इ योग करत आहेत त्यांची प्रतिकारशक्ती जन्मत: कमी असते.

याशिवाय ज्यांच्या पत्रिकेत गोचर शनी किंवा गोचर नेपच्यून जर जन्मरवीशीवरील (म्हणजे युती, प्रतियुती, केंद्र अर्धकेंद्र इ) प्रमाणे योग करत असेल तर अशी मंडळी साथीच्या रोगांनी पट्कन आजारी पडतात.

स्वाईन फ्लूच्या साथीमूळे स्वर्गात गणपतीने मात्र नक्कीच सूटकेचा नि:श्वास टाकला असेल, हे मात्र खरे...

गुरुवार, ३० जुलै, २००९

आजच्या पुरुषांसाठी सप्तपदी धोकादायक का आहे?

हिंदू विवाह कायद्यात लग्न कायदेशीर ठरण्यासाठी आवश्यक मानला गेलेला सप्तपदी हा विधी आवश्यक आहे का? हा प्रश्न मला अनेक वर्षे सतावत आहे. आणि सध्या तरी माझे असे मत आहे की हा विधी व त्याच्या अभिप्रेत अर्थाकडे गंभीरतेने बघितले तर नक्कीच धोकादायक आहे. विशेषत: पुरुषांसाठी तो जास्त धोकादायक आहे.

सप्तपदी या विधीचा उगम झाला तेव्हाची सामाजिक परिस्थिती (लग्नसंस्था) आणी काळाच्या ओघात या विधीचे अस्तित्व टिकून राहणं हे मला खूप विसंगत वाटतं...फ्रिट्स स्टाल या लेखकाचे "रिच्युअल्स अँड मंत्राज- रूल्स विदाउट मीनिंग" नावाचे एक पुस्तक मोतीलाल बनारसीदास या प्रकाशकानी प्रसिद्ध केले आहे. त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेतले "रिच्युअल इज़ ट्रान्समिटेड नॉट ओन्ली विदाउट मीनिंग, बट ऑफन विदाउट लँग्वेज" हे वाक्य लक्षात घेतले तर सप्तपदी हा लग्नाला कायदेशीर 'पूर्णत्व' आणि 'अर्थ' देणारा विधी आजच्या काळात टाकाऊ का आहे ते समजायला मदत होईल.

पुरातन काळापासून ते अगदी परवा-परवा पर्यंत म्हणजे चॅनेल संस्कृती आपल्यावर येउन आदळे पर्यंत "स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकर:" ही साक्षात्‌ अर्जुनाला पडलेली चिंता तुमच्या आमच्या सर्वांच्याच मनात घट्टपणे रुतून बसली होती. यातील सर्वात गमतीचा भाग म्हणजे भगवंतानी "मयाध्यक्षेण प्रकृति: सूयते सचराचरम्‌" असे पुढे एके ठिकाणी म्हणून (पर्यायाने वर्णसंकर पण आपल्याच अध्यक्षतेखाली चालतो) अशी स्वत:च कबुली दिली आहे. सांगायचे तात्पर्य असे की, वर्णसंकराची आणि अनौरस प्रजेच्या जबाबदारीची भीति यामुळे सप्तपदीच्या वेळी घेतली जाणारी नातिचरामिची शपथ अस्तित्वात आली असावी असा सर्वसाधारण तर्काला पटणारा कयास आपल्याला बांधता येतो.

मुळात लग्न म्हणजे काय? तर भारतापुरते बोलायचे झाले, तर असे सांगता येईल दोन भिन्न लिंगी व्यक्तीनी एकत्र राहण्याचा निर्णय घेणे आणि कामजीवन उपभोगून समाजाला मान्य अशा पद्धतीने प्रजोत्पादन करणे. मनुष्यप्राण्याखेरीज अन्य कोणत्याही समाजप्रिय प्राण्यात अशी कामजीवन सुरू करण्यासाठी सामाजिक मान्यता घेतली जात नाही. मनुष्यप्राण्याच्या बाळाना दीर्घकाळ संगोपनाची गरज असते. ही गरज योग्य तर्‍हेने पूर्ण व्हावी यासाठी संगोपनासाठी आवश्यक असलेल्या श्रमांची विभागणी नैसर्गिक रितीने म्हणजे 'गुणकर्म विभागश:' अशी झाली. अन्न गोळा करणे, शिकार करणे, शत्रुच्या हल्ल्यापासून आपल्या टोळीचे रक्षण करणे ही कामे पुरूषांच्याकडे आणि प्रजेचे संगोपन स्त्रीया करू लागल्या. शारिरीक ताकदीमध्ये पुरुषांच्या तुलनेत निसर्गत: कमी पडल्यामुळे चूल आणि मूल यांच्याशी 'बांधली गेलेली' कालची स्त्री पोषण-रक्षण करण्याची वस्तू बनली. हे बहूतेक सर्वांना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे सर्वांना ठाउक असते. पण 'आजची स्त्री पुरुष-प्रधान व्यवस्थेचा बळी आहे' या घोषणाबाजीमध्ये वास्तव बर्‍याचवेळा दूर सारले जाते.

असो. आजची स्त्री मात्र पूर्ण वेगळी आहे. ती एक तर मुक्त आहे किंवा मुक्त होण्यासाठी धडपडत आहे, मग ती समाजाच्या कोणत्याही थरातील असो. या धडपडीचे मी जेव्हा त्र्ययस्थपणे निरीक्षण करतो तेव्हा मात्र ही धडपड, आटापिटा नैसर्गिक श्रमविभागणीच्या जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी आहे का असा प्रश्न पडतो. बरं, स्त्री आज जेव्हा नैसर्गिक जबाबदार्‍याना लाथ मारून, झिडकारून काही मिळवायचा प्रयत्न करते तेव्हा तीच्या मुक्तीचा उदो-उदो होतो. पुरूषाने त्याची नैसर्गिक जबाबदारी झटकली किंवा ती पुरी करण्यात तो कमी पडला तर तो मात्र समाजाच्या आणि त्याच्या कुटुंबीयांच्या छी-थूला आणि प्रसंगी शिक्षेला पात्र ठरतो.

नुकताच घडलेला एक प्रसंग. पुण्यात डॉक्टर मंडळीनी विवाहसंस्थेच्या भवितव्याविषयी आयोजित केलेल्या एका चर्चासत्राला उपस्थित राहिलो होतो. मंचावर काही वकील आणि काही डॉक्टर उपस्थित होते. त्यात एका वकीलीण बाईनी त्यांच्याकडच्या एका घटस्फोटासाठी आलेल्या (कोकणस्थ ब्राह्मण) मुलीची गोष्ट सांगितली. ही मुलगी घटस्फोटासाठी आपला अपत्यावरचा हक्क सोडायला तयार झाली होती. वकीलीण बाईना या मुलीचे मोठ्ठे कौतुक वाटले होते, कारण तिने मातृत्वाच्या हक्कावर पाणी सोडण्याचे औदार्य/धाडस(!) दाखवले (पण मातृत्वाची जबाबदारी तीने झटकली यात मात्र वकीलीण बाईना काहीही गैर वाटत नव्हते). ही़च बाजू उलटी असती म्हणजे एखाद्या पुरुषाने आपल्या अपत्यावरचा हक्क सोडायचा ठरवला तर मात्र संपूर्ण कायदे-यंत्रणा त्या पुरुषाला ओरबाडण्यासाठी, झोडपण्यासाठी खडबडून जागी झाली असती.

थोडक्यात सांगायचे झाले तर पुरुषाच्या प्रत्येक चूकीला समाज कठोरपणे शिक्षा करतो पण मुक्त स्त्रीच्या चुकीला (खुनासारखे अपवाद वगळता) कोणतीही शिक्षा नाही. मुक्त स्त्री कशालाही बांधिल नाही.

ज्या विधीना सद्यस्थितीमध्ये फारसा अर्थ नाही अशा विधीद्वारे विवाहाचे बंधन एखादा पुरुष जेव्हा स्वीकारतो, तेव्हा तो 'सप्तपदी' सारख्या विधीमुळे तो कोणते धोके स्वत:वर ओढवून घेतो याचा तटस्थपणे विचार प्रत्येक विवाहेच्छु पुरुषाकडून व्हावा असे मला वाटते.

१. पुनर्जन्म या कल्पनेला वैज्ञानिक आधार काही नाही. मनुष्यप्राणी निसर्गत: एकनिष्ठ राहण्यासाठी निर्माण झाला नाही. एकनिष्ठता ही समाजाने स्वीकारलेली कल्पना आहे. केवळ धार्मिक कल्पना म्हणून सातजन्म एकनिष्ठ राहण्याची शपथ घेणे कितपत योग्य आहे?

२. पुरूष जेव्हा त्याच्या भावनिक, शारिरीक गरजा पूर्ण न झाल्याने कुटुंबाची सीमारेषा ओलांडतो तेव्हा तो 'बाहेरख्याली' ठरतो. पण याच कारणांसाठी स्त्री जेव्हा कुटुंबाची सीमारेषा ओलांडते तेव्हा मात्र ती 'शोषित' असते. अशा स्त्री पासून वेगळे व्हायचे असले तरी तीच्या नवर्‍याला तीची पूर्ण व्यवस्था करून मगच वेगळे होता येते.

३. एखादी व्यक्ती एखाद्या समूहाचे सदस्यत्व जेव्हा स्वीकारते तेव्हा त्या समूहाचे नियम नवीन सद्स्यावर बंधनकारक असतात. पण आधुनिक मुक्त स्त्री मात्र याला अपवाद आहे. संपूर्ण कुटुम्बाने, शक्य असो वा नसो, तिच्या कलाने घेतले नाही तर 'छ्ळ झाला, छ्ळ झाला' म्हणून ऊर बडविण्यास मुक्त स्त्री मोकळी असते. इतकेच नव्हे तर कायदा पण तिच्या मदतीला पूर्ण ताकदीनीशी उभा राहतो. मुक्त स्त्री कपटी, ढोंगी, क्रूर असू शकते हे मात्र कायदा मानत नाही. तसं असते, 'मॅन इज गिल्टी अण्टील प्रुव्हन इनोसंट' हे तत्त्व मार्गदर्शक तत्त्व म्हणून कायद्याने स्वीकारले नसते.

४. एखादे लग्न परिचयोत्तर होत असेल तर ते पूर्ण विचारांती होत आहे असे मानून एकनिष्ठ राहण्याची शपथ घेणे तर्क-सुसंगत ठरते पण जेव्हा 'स्थळे बघून' विवाह जुळवले जातात तेव्हा आपण ज्या मुलीबरोबर सात जन्म एकनिष्ठ राहण्याची शपथ घेणार आहोत ती मुलगी, विशेषत: कायदे एकतर्फी असताना, आपल्या जबाबदार्‍या पूर्ण पाडेल याची कोणतीही खात्री नसताना, पुरुषाने अशी शपथ घेणे हे आत्मघातकीपणाचे निदर्शक आहे, असेच माझे स्पष्ट मत आहे.

हिंदुविवाह कायद्यानुसार म्हणजे धार्मिक रितीरीवाजानुसार होणारे लग्न जेव्हा मोडते तेव्हा, कुणाला पटो अथवा न पटो पुरुषांचे लचके, कायद्याच्या मदतीने जास्त तोडले जातात. त्यासाठी सतराशेसाठ कायदेशीर मार्ग उपलब्ध असतात. कारण कायद्याच्या दृष्टीने तुम्ही अग्नी, देव, ब्राह्मण यांना साक्षी थेवून घेतलेली शपथ मोडत असता. याला एक महत्त्वाचा पर्याय आहे तो म्हणजे लग्न, स्पेशल मॅरेज ऍक्ट खाली म्हणजे सह्या ठोकून करणे. यात तुम्ही जोडीदाराचा कायदेशीर पती अथवा पत्नी म्हणून स्वीकार केलेला असतो. कोणतीही शपथ यात नवरा-नवरीने घेतलेली नसते. खरं तर 'स्थळे बघून' होणार्‍या लग्नांसाठी हाच सर्वोत्तम पर्याय सद्यस्थितीमध्ये उपलब्ध आहे. पण समाजाच्या आणि कुटुंबाच्या दडपणामुळे हा पर्याय अजुनही तितकासा रूळलेला नाही.

थोडक्यात स्त्री खरोखर 'बद्ध' होती तेव्हा सप्तपदी या विधीला अर्थ होता, आजच्या संदर्भात हा विधी पुरुषांसाठी नक्कीच धोकादायक आहे.

मंगळवार, २१ जुलै, २००९

एक किस्सा - पोथीनिष्ठेच्या पराभवाचा

ही घटना एकदम खरीखुरी आहे...

झालं काय, काही महिन्यांपूर्वी MSEBच्या कृपेने चालू असलेल्या वीजेच्या चढ उतारामुले माझ्या ब्रॅन्डेड पीसीने मान टाकली. मी कंपनीला फोन केला आणि तक्रार नोंदविली. माझ्या तक्रारीची त्वरीत दखल घेउन कंपनीने त्यांच्या हार्ड-वेअर इंजिनिअरला माझ्याकडे पाठवले.

त्या इंजिनिअरने मशिनची पहाणी करून मला त्याचे निदान सांगितले. पीसीच्या मदर-बोर्ड वरील एक चिप बहूधा जळाली असावी. सर्विस सेंटरला मदर-बोर्ड नेउन खरे कारण तपासता येईल व खर्चाचा अंदाज देता येईल, असे त्याने मला सांगितले.

मला होकार देण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

दोन दिवसांनी कबुल केल्या प्रमाणे इंजिनिअरने दूरुस्त केलेला मदर-बोर्ड आणला. बिलाची रक्कम फार नसल्याने मी पण खुशीत होतो. दोन दिवस जगाशी संपर्क तुटल्यामुळे सैरभैर झाल्यासारखे झाले होते.

प्रथम मला त्या इंजिनिअरने मदर-बोर्ड वर कोणता भाग बदलला ते दाखवले. मदर-बोर्डला मेमरी चिप बसवल्या आणि एक एक करत इतर उपकरणे- म्हणजे हार्ड डिस्क, सीडी रायटर इ. बसवायला सुरुवात केली.

सर्व जोडणी झाल्यावर त्याने स्वीच ऑन केला. पण पीसीने डॊळे काही उघडले नाही. मला थोडा धीर धरणे भागच होते. करणार काय?

इंजिनिअरने पुन्हा मेन सप्लाय बंद करून सर्व केबल्स व्यवस्थित बसल्या आहेत याची खात्री केली आणि पुन्हा बटन ऑन केले.

पण पीसीने डॊळे काही उघडले नाहीत...

आता इंजिनिअरने बाह्या सरसावल्या. यावेळेला त्याने कोणती तरी केबल बदलायचे ठरवले. ती बदलून परत सर्व उपकरणांची जोडणी केली आणि बटन ऑन केले.

पण पीसीने डॊळे काही उघडले नाही...

मी एकंदर प्रकाराचा अंदाज घेउन त्या दिवशी योजलेले सर्व कौटुम्बिक कार्यक्रम रद्द करायचे ठरवले.

इंजिनिअरने आता पूर्ण एकाग्रतेने लढायचा निर्धार केला असावा. मी पण त्याला टेन्शन नको म्हणून हलक्या फुलक्या गप्पा मारायला सुरुवात केली. मधेच तो आशेने स्वीच ऑन करी.

पण काही केल्या पीसी डॊळे काही उघडेना...

होता होता रात्रीचे नउ वाजले. घरातले सर्व जण बाहेर जायचा कार्यक्रम रद्द झाल्याने नाराज होते. माझी मनस्थिती पण चमत्कारिक झाली होती. मी इंजिनिअरला दूसर्‍या दिवशी येण्याविषयी सुचवले.

त्याला हो म्हणण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

त्याने बहूधा मला बरे वाटावे म्हणून पुन्हा मदर-बोर्ड तपासून आणतो असे सांगितले. या पर्यायाला माझी काहीच हरकत नव्हती.

दूसरा दिवस शनिवार होता. नव्या हूरुपाने इंजिनिअरने कामाला सुरुवात केली. आज त्याने नव्या केबल्स आणल्या होत्या. peripheralsच्या काही कॉम्बिनेशन्स्ची नवी यादी कागदावर लिहून आणली होती. एकेक पर्याय पायरीपायरीने एलिमिनेट करायचा आणि पीसीला जिवंत करायचेच असे त्याने ठरवले होते. त्याच्याकडची ती पर्यायांची यादी (check list) बघून मी पण हादरलो. कारण सुट्टी वाया जायची शक्यता होती. पण पीसी जिवंत होणे आता आवश्यक होते. मी सदस्य असलेल्या एका याहू ग्रुपवर लावलेली (वैचारिक) आग माझ्या अनुपस्थितीत विझून जायची शक्यता होती. रणछॊडदास म्हणून माझी संभावना झाली असती तर ती मला खपली नसती.

तरी पण त्या इंजिनिअरने नियोजनबद्धरितीने चालू ठेवलेले प्रयत्न पाहून मला उतावीळ होऊन चालणार नव्हते. पण आज त्या इंजिनिअरचे तारे शुभ स्थानातून आणि शुभ दृष्टीने चमकत होते. एक हार्ड डिस्क आणि ५०० mb मेमरी या रचनेला पीसीने डोळे किलकिले केले. पीसी बूट होऊ लागला. इंजिनिअरला हायसे वाटले. त्याने मला हाक मारून हा चमत्कार दाखवला. मी पण थोडा सुखावलो.

पण घोडा मैदान अजून बरेच दूर होते. कारण अजून बरीच peripherals जोडायची शिल्लक होती. कारण पीसीने मान टाकायच्या अगोदर ती सर्व गुण्यागोविंदाने काम करत होती. मी नम्रपणे इंजिनिअरच्या ते लक्षात आणून दिले. इंजिनीअर मानेनेच हॊ म्हणून परत पीसीला भिडला...

त्याच वेळेस माझ्या डोक्यात एक विचार चमकून गेला. पण तो त्या इंजिनीअरला सांगायचे धारिष्ट्य माझ्यात नव्हते. ज्या विषयातले आपल्याला कळत नाही त्यातल्या समस्येला उपाय सूचवणे याला quackery म्हणतात असे मी अलिकडेच कुठे तरी वाचले होते. शिवाय आजवरच्या विज्ञानाचा इतिहास बघितला तर पोथिनिष्ठेला प्रतिभेने किंवा क्लृप्तीने जेव्हा जेव्हा टक्कर दिली आहे तेव्हा तेव्हा टक्कर देणार्‍या लोकांनी जबरदस्त किंमत मोजली आहे असेच दिसते. शिवाय मला हार्डवेअर मधले काही कळत नाही. म्हणून मी गप्प बसणे पसंत केले.

एव्हाना जवळ जवळ चार तास उलटले होते. मी आम्हा दोघांसाठी चहा केला. चहा पिताना इंजिनिअरच्या कपाळावर घामाचे थेंब जमून चमकताना दिसत होते. मी त्याला बोलते करण्यासाठी परत इकड्च्या गप्पा मारायला सुरुवात केली.

बोलता बोलता मी विचारले,

"ही सर्व कॉम्बिनेशन्स तपासून झाली का?"

"हो"

" मग आत काय करायचं?"

इंजिनिअरअने मला आता एक नवा पर्याय सुचवला. सर्वच्या सर्व कंप्युटर service centre मध्ये न्यायचा आणि तिथे सगळ्या गोष्टी परत तपासायच्या.

हा पर्याय मला तितकासा पटला नाही. कारण माझी हार्ड डिस्क तो घेउन जाणार म्हणजे बोंबला!

मी शेवटी त्याने केलेल्य प्रयत्नांचे भान ठेउन त्याला माझ्या डॊक्यात चमकून गेलेला विचार सांगायचे ठरवले.


" हे बघा! तुम्ही तुमच्याकडून तुमचे प्रयत्न करत आहात ते मी बघतोच आहे. पण माझ्यासाठी
म्हणून मला सुचलेला एक पर्याय तुम्ही ट्राय करावा असे मला वाटते. मला हा पर्याय का करावासा वाटतो याचे तुम्हाला पटेल असे कोणतेच स्पष्टीकरण माझ्याकडे नाही कारण मला हार्डवेअर मधले काही कळत नाही. पण तुमचा आणि माझा दोन दिवस बराच वेळ यात गेला आहे."

माझ्याकडे हताशपणे नजर टाकून 'हा काय आता सांगणार आहे' अशा आविर्भावात इंजिनिअरने एका बाजूला मान कलती करून होकारार्थी खांदे उडवले.

मी त्याला म्हटले,

" हे पहा हा पीसी मी बराच अपग्रेड केला आहे आणि तो टप्प्याटप्प्याने अपग्रेड केला आहे. असे करत असताना प्रत्येक टप्प्यावर तो व्यवस्थित काम करत होता."

इंजिनिअरने मानेनेच होकार दर्शवला.

"तेव्हा आपण त्याच क्रमाने तो असेंबल करत जाऊ आणि एक एक peripheral ऍड करत जाऊ."

इंजिनिअरला आता "हो" म्हणण्याशिवाय गत्यंतर नव्हते. पण त्याच्या समृद्ध अनुभवविश्वाच्या पलिकडचा आणि तो पण हार्डवेअर मधले ओ की ठो न कळणार्‍या customer ने सुचवलेल्या पर्यायाबद्दलची नाखुषी त्याच्या चेहर्‍यावर मला स्पष्ट दिसत होती. पण तो हा प्रयत्न करायला तयार झाला होता.

मी त्याला ज्या क्रमाने पीसीचे अपग्रेडेशन झाले होते तो क्रम सांगितला. त्याने त्या क्रमाने एक एक peripheral जोडत असताना पीसी बूट होतो का ते बघितले आणि गम्मत म्हणजे तसे घडत गेले. माझा पीसी पूर्ण जिवंत झाला. या नव्या अनुभवाने इंजिनिअरच्या पोथीनिष्ठेला आणि आजवरच्या अनुभवाला एक धक्का बसला होता. थोडेसे ओशाळून का होईना त्याला ते स्वीकारणे भाग होते.

माझ्या अंत:प्रेरणा शाबूत असल्याचा अनुभव आल्याने मी पण सुखावला गेलो होतो.

मंगळवार, १४ जुलै, २००९

२२ जुलै २०००९ रोजी होणारे सूर्यग्रहण कुणाला त्रासदायक?

दिनांक २२ जुलै २०००९ रोजी होणारे सूर्यग्रहण खालील कालावधिमध्ये जन्मलेल्या व्यक्तीना कोणत्या ना कोणत्या स्वरुपात त्रासदायक ठरायची शक्यता आहे. मुळ पत्रिकेतील रविचंद्रादि ग्रह व त्यांनी केलेले योग यावर ग्रहणाच्या फळांची तीव्रता अवलंबून राहिल. तरी या व्यक्तीनी ग्रहणाच्या अलिकडे आणि पलीकडे कमीतकमी १५ दिवस कोणतेही धोका, धाडस शक्यतो करू नये आणि केल्यास आवश्यक ती काळजी घेउन मगच पावले टाकावीत.

जुलै १९४६
अप्रिल १९४७
ऑक्टोबर १९५३

ऑक्टोबर १९५४
फेब्रुअरी १९५५
जानेवारी- ऑक्टोबर १९५६
जुलै १९५७

मे १९६१
जन १९६२

एप्रिल १९६९
फेब्रुअरी १९७४
नोव्हे १९७४
मे- सप्टे १९७५
मे १९७६

फेब्रुअरी १९८३
नोव्हे १९८२
ऑगस्ट १९८३
ऑक्टोबर १९८३

शनिवार, ४ जुलै, २००९

परवाचीच गोष्ट ... दोन भूभूंची

परवाचीच गोष्ट ... दोन भूभूंची
(काही सत्य घटनांवर आधारीत)

शेवटी एकदाचा मॉन्सुन येऊन ठेपला आणि मला विद्यापीठात चालायला जायची हूक्की
आली. गाडी काढली आणि विद्यापीठ गाठले. छत्रपतींच्या पुतळ्याजवळ गाडी पार्क करून
बाहेर पडलो आणि बारीक तुषार अंगावर येण्यास सुरुवात झाली होती.

तोंडाने मल्हारच्या सुरांचे नोम-तोम आळवत चालायला सुरुवात केली. पुणे
विद्यापीठाविषयी मला तसे काही फारसे प्रेम किंवा अभिमान नाही, पण शुद्धहवेची
हमी देणार्‍या ज्या काही थोड्याफार पुण्यात जागा आहेत त्यातली एक जागा एवढेच
माझ्यादृष्टीने त्या परिसराचे महत्त्व.


चालता चालता मुख्य-इमारतीपाशी येऊन पोचलो आणि पुढे आयुका पर्यंत जावे आणि
आकाशगंगेतले तारे मोजून परत फिरावे असा विचार केला. मल्हार गुणगुणत चालता
चालता काही वर्षापूर्वी म्हणजे १९९१ साली घडलेला एक किस्सा आठवला. तोंडाने चालू
असलेला मल्हार बंद पडला आणि एकदम हसू फुटले.

असेच पावसाचे दिवस होते. मी तेव्हा संगणकशास्त्र विभागात नोकरी करत होतो.
दुपारी जेवायला एमबीए कॅन्टीन किंवा ओल्ड कॅन्टीनला जायचे असा नेम होता.
तेवढ्यात समोरून एक मोठा ट्रक बांधकामाचे साहित्य घेउन हळूहळू चालला होता.
विद्यापीठातील विद्येच्या उजेडाने त्या बिचार्‍या ट्रकवाल्याचे डोळे दिपले
असावेत आणि त्यामुळे तो रस्ता चुकला असावा.

मी विरुद्ध दिशेने येत असल्याचे बघून तो ट्रक माझ्यापाशी येऊन थांबला आणि
जागेवरूनच ड्रायव्हरने विचारले,

"साब, यहाँ होटल किदर है?"

"होटल? कौनसा होटल? यहाँ तो कोई होटल नही हैं". मी उत्तरलो.

त्यावर त्याने खिशातून एक कागद काढला आणि हात बाहेर काढून माझ्यासमोर धरला.
त्या कागदावर लिहिलेला पत्ता वाचून मी खोखो हसायला लागलो. तो पत्ता असा होता-

होटल आयुका
पुना युनिव्हर्सिटी कॅंपस
मेन बिल्डींग के आगे
पिन ४११००७

मी का हसत होतो ते त्या ट्र्कवाल्याला काही कळणे शक्य नव्हते. आकाशगंगेतल्या
समस्त ता‍र्‍याना मात्र ते कळले असावे कारण ते काही क्षण चमकायचे थांबले असा
मला भास झाला. मी त्याला हॉटेल आयुकाची दिशा सांगितली आणि पोटपुजेसाठी भरभर
पावले उचलायला सुरुवात केली.

हळु हळु दिवस जात होते. 'होटल आयुका' धीम्या गतीने उभे राहत होते. मी वरील
प्रसंग विसरून गेलो होतो. एक दिवस माझ्या आयायटीतल्या एका मित्राचा मला अचानक
फोन आला. आम्ही दोघे एकाच होस्टेल आणि डिपार्टमेंट्चे. फक्त मी त्याला बराच
सीनियर होतो. मित्राने मला सांगितले की तो कसल्याशा सिम्पोझियमसाठी तो 'आयुका'त
आला होता. त्याला थोडा वेळ होता म्हणून त्याने मला फोन करून बोलावले होते. मी
हातातलं काम टाकून
आयुकाच्या दिशेने निघालो.

बर्‍याच वर्षानी भेटत असल्यामुळे सुरुवातीच्या गप्पाटप्पा होस्टेलच्या
आठवणीभोवती रंगल्या. मी हळुच त्याला प्रश्न विचारला.

"तू, या सिम्पोझियममध्ये काय करतोय"

"काही नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत वचवच ऐकायची"

"आणि मग?" - मी

"Some lucky souls find here their scientific husbands and scientific wives"

"what next?"

"here you 'mate'(!) with your scientific
husbands or scientific wives and have fun... "

"इथेच?" - मी चक्रावून विचारले

"हो तर. देन वी प्रोड्युस न्यु थिअरीज"

मला 'होटल आयुका' शोधणार्‍या ट्रक ड्रायव्हरची आठवण झाली. मी तो किस्सा
मित्राला सांगितला तेव्हा तो पण खळखळून हसला. यावर आम्ही एकमेकांचा निरोप घेतला
आणि निघालो.

पावसाची रिपरिप वाढली तशी माझी पावले भरभर पडायला सुरुवात झाली. आयुकाच्या
अभेद्य तटबंदीजवळ मी येउन पोचलो होतो. तिथे आडोशाला दोन कुत्री उभी होती. पाउस
कमी झाल्यावर पुढे चालावे असा विचार करून मीपण चंद्र्शेखर ऑडिटोरियमजवळ आसरा
शोधला आणि पाउस कमी व्हायची वाट बघत उभा राहीलो.

आजुबाजुला फारसे कोणी नव्हते. तेवढ्यात ती दोन कुत्री माझ्या दिशेने आली आणि
जोरजोरात भूंकू लागली. सुरुवातीला मी दूर्लक्ष केले, पण त्यांचे भूंकणे काही
थांबेना म्हणून जवळ पडलेला दगड मी त्यांना मारण्यासाठी भिरकावणार एवढ्यात
लांबून एक वॉचमन ओरडला -

"साब! उनको पत्थर मत मारो!"

"क्यूं. काटेंगे तो आपके साब दवा पानी करेंगे क्या?" मी चिडून विचारले.

एकाच वेळेला वॉचमन आणि ती कुत्री भूंकत माझ्याकडे यायला सुरुवात झाली. वॉचमन
जवळ आला आणि माझ्या कपाळावरच्या आठ्या बघून मला म्हणाला,

"साहेब, रागवू नका पण एक विचारू का?

मी मानेनेच हो म्हटले.

"तुम्ही ज्योतिषी आहात का?"

कुत्री अचानक भूंकायची थांबली.

"हो! का?"

"काही नाही. इथली कुत्री ज्योतिषांवर खूप खवळतात."

"का? काय झालं"

"मागे इथल्या काही साहेब लोकांनी ज्योतिषाची टेस्ट घेतली आणि त्यात ज्योतिषी
फेल झाल्याच त्यांनी एकतर्फी जाहिर केलं तेव्हापासून इथल्या कुत्र्यांना
ज्योतिषांचा जरा देखिल वास लागला तरी ती खवळतात."

ते ऐकून मी पण चिडलो.

"ज्योतिषांची टेस्ट घ्यायला तुमचे साहेब कोण लागून गेले" - मी पण आता खवळलो
होतो.

कुत्री जोरजोरात भूंकायला लागली.

"आंतरराष्ट्रीयकीर्तीचे शास्त्रज्ञ". वॉचमनने भाषांतर केले...

"मग मी पण सांगेन ती टेस्ट करणार का"

कुत्र्यांनी प्रश्नार्थक शेपूट हलवली.

"तुमच्याच लायब्ररीमधली गेल्या दहा वर्षात प्रसिद्ध झालेली कोणतीही १०० पुस्तके
डोळे मिटून उचला आणि किती पुस्तकात तुमच्या साहेबांचे नाव सापडते ते नीट मोजून
सांगा"


आता वॉचमन प्रश्नार्थक नजरेने कुत्र्यांकडे बघू लागला. कुत्र्यांना माझा प्रयोग
पटला की नाही ते माहित नाही पण शेपूट पायात घालून त्या सारमेयांनी घूमजाव केले.

पाउस थांबला होता. मी पण घराच्या दिशेने चालायला सुरुवात केली...

बुधवार, १ जुलै, २००९

The Anatomy of Hope

सध्या मी जेरी ग्रुपमान या डॉक्टरने लिहिलेले The Anatomy of Hope हे पुस्तक
वाचत आहे. वाचत आहे अशासाठी म्हटले कारण पुस्तक अजुन वाचून संपवता आले नाही.
सुरुवातीची प्रकरणे वाचताना आधुनिक वैद्यकाबद्दल काही प्रश्न निर्माण झाले आणि
त्यामुळे कमालीची अस्वस्थता निर्माण झाली म्हणुन मी त्यातील The biology of
hope या प्रकरणावर उडी मारली.

या प्रकरणात मानवी आशेची चिरफाड करताना डॉ. ग्रुपमानने 'विश्वास आणि अपेक्षा'
(belief and expectations) हे दोन घटक आशेमागे लपलेले असतात असे म्हटले आहे.
आशावादी माणसाचा मेंदू काही विशिष्ट रसायने (Neurotransmitters) तयार करतो आणि
त्यामुळे बरे होण्याची प्रक्रिया लवकर घडून येते, असे काहीसे स्पष्टीकरण त्याने
दिले आहे.

या इथे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो तो असा की विश्वास आणि अपेक्षा
मेंदूला बरे होण्याच्या प्रक्रियेसाठी जर उद्युक्त करत असतील तर बुद्धीवादी आणि
अंधश्रद्धावाल्यांचा थयथयाट कशासाठी चालू द्यायचा. आपल्या श्रद्धेच्या
चौकटीबाहेरचे कोणते उपाय स्वीकारायचे अथवा नाकारायचे हा ज्या त्या व्यक्तीचा
प्रश्न आहे. हे स्वातंत्र्य अंधश्रद्धानिर्मूलनवाले नाकारणार असतील तर
त्यांच्यात आणि तालिबान यांत फरक तो कोणता?


राजीव उपाध्ये

गुरुवार, १६ एप्रिल, २००९

मंगळ शनी आणि हर्षलच्या भ्रमणांचा जमाखर्च

आजच्या सकाळ मध्ये पाटणा रेल्वे स्टेशन मध्ये पाटणा-गया एक्सप्रेसला आग
लागल्याचे वृत्त वाचले आणि मंगळ-हर्षलची युती 'साजरी' झाल्याची खात्री पटली.
रेल्वे अपघात आणि आगी हे मंगळ-हर्षल भ्रमणांचे खास वैशिष्ट्य!

याशिवाय ५-१५ एप्रिल या कालावधीत काही प्रमुख ठळक घटना अशा आहेत -

- इटलीमध्ये झालेला भूकंप
- पारोळा येथिल फटाक्याच्या कारखान्याला लागलेली आग
- पोलंड मध्ये एका वसतीगृहाला लागलेली आग
- पाकिस्तानातील दहशतवादी हल्ले
- थायलंड मधील असंतोष
- इंडॊनेशियात ६ आणि ९ एप्रिलरोजी दोन विमाने कोसळून विमानातील सर्वजण ठार

या शिवाय कुणाचे व्यक्तिगत अनुभव असल्यास मला अवश्य कळवावेत. माझ्या ब्लॉगवर
त्यांची दखल घेतली जाईल.

राजीव उपाध्ये
---------------------------
www.yuyutsu.biz
http://rajeev-upadhye.blogspot.com/
--------------------------

सोमवार, २३ मार्च, २००९

मंगळ, शनी व हर्षलची आगामी भ्रमणे

(सूचना - सर्व राशी अंश सायन आहेत. जिज्ञासूनी आवश्यकता असल्यास निरयन करून
घ्यावेत.)

आजच सकाळी CNN कडून एक मेलबॉक्समध्ये बातमी येऊन थडकली आणि ती अशी :-

"-- An airplane crashed near Butte, Montana, killing at least 17 people, the Federal Aviation Administration confirmed"

विमान कोसळणे ही मामुली आणि 'हे काय रोजचेच आहे' म्हणून दूर्लक्ष करण्यासारखी घटना नाही. पण या बातमीमुळे मी आकाशातील ग्रह बघण्यास उद्युक्त झालो हे मात्र खरे. एवढा मोठा अचानक भीषण अपघात म्हणजे कुठे तरी मंगळ आणि शनी कार्यरत असणार।' अचानक', 'अकस्मात' 'उद्‌ध्वस्त करणे' ही हर्षलची खास वैशिष्ट्ये आणि म्हणून गोचरीचे ग्रह तपासले. ते असे आहेत -

दिनांक २३ 3 २००९

मंगळ ६-१२ मीन
शनी १७-१५ कन्या (व)
हर्षल २३-१० मीन

म्हणजे मंगळ लवकरच म्हणजे १५ एप्रिल रोजी हर्षलशी २४-१६ मीनेत युती करणार आहे. त्या अगोदर मंगळाचा शनीशी प्रतियोग ५ एप्रिल रोजी १६-२२ मीनेमध्ये होत आहे. साहजिकच संपूर्ण एप्रिल महिना मानसिक क्षोभ, तडकाफड्की निर्णय, कलह, अपघात आणि इतर चिंता निर्माण करणार्‍या घटनानी भरलेला राहील.

कोणतेही नवीन कार्य, प्रकल्प शक्यतो संपूर्ण एप्रिलमध्ये हाती घेऊ नये असा माझा सर्वाना सल्ला आहे. कारण तसे केल्यास त्या कार्यावर या अशुभ योगांची छाया कायमची पडेल.

मंगळ, शनी व हर्षल यांनी आगामी काळात जो धुमाकूळ घातला आहे तो गेल्या १० जुलैला झालेल्या शनी-मंगळ युतीच्या दर्जाचाच आहे. त्या योगामध्ये दिल्ली, बंगलोर येथे झालेल्या घातपाती कारवाया विसरून चालणार नाही.

मंगळ, शनी व हर्षलच्या भ्रमणांचा सर्वात जास्त त्रास कोणाला?

या प्रश्नाचे उत्तर मध्यबिंदू ज्योतिषाच्या मदतीने अचूक देता येते. आज (म्हणजे दि. २३ मार्च २००९ रोजी) मंगळ आणि हर्षलचा मध्यबिंदू १४-४४ मीने मध्ये आहे. तो १५ एप्रिलरोजी हर्षलशी २४-१६ मीनेत युती करे पर्यंत सुमारे १० अंशाचे क्षेत्र प्रभावित करतो. केवळ मीनेतीलच नव्हे तर मिथुन, कन्या, धनु या राशी मध्येपण १४-४४ ते २४-१६ या अंशात्मक क्षेत्रावर मंगळ आणि हर्षलचा मध्यबिंदू केंद्र आणी प्रतियुती या योगांद्वारे प्रभाव टाकतो.

त्यामूळे ज्यांच्या पत्रिकेत १४-४४ ते २४-१६ मीन, मिथुन, कन्या, धनु हे क्षेत्र प्रभावित झाले आहे - म्हणजेच पत्रिकेतील एखादा ग्रह या अंशात आहे त्यांना एप्रिल महिना कटकटीचा ठरणार आहे. त्यात जर रवि, चंद्र, लग्न व ख-मध्य हे या क्षेत्रात पडले असतील तर या ग्रहांच्या भ्रमणांची फले जास्तच त्रासदायक मिळतील.अपघात आणि गुन्हेगारी हा या घटनांचा स्थायीभाव असेल.

आता उदाहरण म्हणून जन्मरवीचे घेऊ.

रवीची गती रोज अंदाजे १ अंश इतकी असते. मंगळ-हर्षल युतीपर्यंत म्हणजे १५ एप्रिल पर्यंत रवी १० अंश पुढे सरकेल.

रवि दरवर्षी ५ मार्च रोजी मीनेमध्ये १४-४४ अंशावर येतो. तसेच दरवर्षी ७ सप्टेंबर रोजी कन्या राशीत, ५ जून रोजी मिथुन राशीत व ६ डिसेंबर रोजी धनु राशीत १४-४४ अंशावर येतो. तसेच १५ मार्च रोजी २४-१६ मीनेत, १५ जून रोजी मिथुन राशीत, १६ डिसेंबर रोजी धनु राशीत व १७ सप्टेंबर रोजी कन्या राशीत २४-१६ अंशावर
येतो.

तेव्हा ज्यांचे जन्मदिनांक ५ -१५ मार्च, ७ -१७ सप्टेंबर, ५ -१५ जून व ६ -१६ डिसेंबर या दरम्यान आहेत, त्यांच्या जन्मरवीशी गोचर मंगळ आणि हर्षलचा मध्यबिंदू युती, प्रतियुती, व केंद्र हे योग करतो. इतर ग्रहांची Janus 4.१ या सॉफ्टवेअरच्या मदतीने अशीच गणिते करून भाकीतात अचूकता आणता येते.


मंगळ-हर्षल=जन्मरवि या समीकरणाचा अर्थ एबर्टिनने पुढीलप्रमाणे दिला आहे.

"A sound physique capable of sudden extra-effort, a person who is able to act quickly.- A sudden adjustment to new circumstances and conditions in life, injury, accident, operation, birth."

तसेच मंगळ-हर्षल=जन्मचंद्र या समीकरणाचा अर्थ एबर्टिनने पुढीलप्रमाणे दिला आहे.

"Energy or power of life governed by feeling, the desire to achieve something very big, ambition.- Special effort expended by a woman (birth). – Accident or injury happening to girls and woman."

चंद्र हा भावनांचा कारक ग्रह असल्यामुळे भावनिक क्षोभाच्या घटना असा या समीकरणाचा अर्थ लावता येतो.

मंगळ-हर्षल=जन्मलग्न या समीकरणाचा अर्थ एबर्टिनने पुढीलप्रमाणे दिला आहे-

"An excitable person with the inclination to commit acts of violence.- An upsetting event, accident, physical injury, (arrest)."

मंगळ-हर्षल=जन्मख-मध्य या समीकरणाचा अर्थ एबर्टिनने पुढीलप्रमाणे दिला आहे-

"An inflexible character, the desire for independence, a person "putting the pistol to someone's head", an act of violence, extraordinary achievements.- The execution of drastic and violent measures, injury, accident , operation."


टीप - मध्यबिंदूची समीकरणे कशी मांडतात हे समजावून घेण्यासाठी या ब्लॉगला पुन:
जरुर भेट द्या.

सोमवार, १६ मार्च, २००९

अर्धकेंद्र योग

आमचे विद्वान ज्योतिर्विद मित्र धोण्डोपन्त आपटे यानी त्यांच्या ब्लॉगवर केलेले खालिल विधान आम्हाला अतिशय धक्कादायक वाटले. ते विधान असे, "तसेच अर्धलाभयोग, अर्धकेंद्रयोग वगैरे फलिताच्या दृष्टीने गौण योग सुद्धा आहेत."

अर्धलाभ योगाचा माझा अभ्यास कमी आहे (म्हणून त्याविषयी बोलणे उचित नाही), पण संपूर्ण मध्यबिंदू ज्योतिषाचा डोलारा अर्धकेंद्र योगावर उभा आहे असे म्हटले तरी चालेल. पुढे जाउन सांगायचे झाले तर अर्धार्धकेंद्र योग (२२.५ अंश) पण मध्यबिंदू ज्योतिषात कुशल ज्योतिषी सर्रास वापरतात.

अर्धकेंद्र योगाचा विचार करताना पुढे दिलेल्या गोष्टी प्राधान्याने विचारात घ्याव्या लागतात-

० अर्धकेंद्रयोगात कोणते ग्रह आहेत?

म्हणजे दोन शीघ्रगती ग्रह किंवा दोन अतिमंदगती ग्रह (युरे., नेप., प्लुटो) आपापसात अर्धकेंद्र योग करत असतील तर ते गौण ठरतात. पण एक मंदगती ग्रह आणि एक शीघ्रगती ग्रह असा योग होत असेल तर अर्धकेंद्रयोग केंद्र योगाइतकेच ताकदवान ठरतात. उदा - रवि-शनी, रवि-युरेनस, रवि-नेपच्युन, रवि-प्लुटॊ (गोचरीने प्लुटॊ रवीशी अर्धकेंद्र योग करत असेल तर मानहानी, आयुष्याची दिशा बदलणे इत्यादि घटना घडताना दिसतात). माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव न्यायालयीन प्रकरणात (सेंट किट्स?) गुंतले गेले तेव्हा प्लुटो गोचरीने त्यांच्या जन्मरवीबरोबर अर्धकेंद्र योग करत होता. माझ्या एका परिचिताने याच योगावर आपले MBBS संपल्यावर चांगले मार्क असुनही मेडिसीन सोडून genetics मध्ये जायचा निर्णय घेतला.

बुध-नेप अर्धकेंद्र योगातील व्यक्ती एकतर खॊटे बोलतात किंवा स्वत: स्वत:ची दिशाभूल करण्याकडे त्यांची प्रवृत्ती असते.

० अर्धकेंद्र योगासाठी २ अंश अथवा त्याहून कमी दीप्तांश घेतले तर हमखास त्यांचे
प्रत्यंतर येताना दिसते.

अर्धकेंद्र योगाचा एक विलक्षण अनुभव नुकताच आला. माझा एक मित्र माझ्याकडे पत्रिका बघायला आला होता. बोलता बोलता मी सहज त्याच्या काही मित्रांची चौकशी केली. तेव्हा त्याने आपल्या एका मित्राचे वैवाहिक जीवन अत्यंत अस्थिर बनल्याचे सांगितले. मी अधिक चौकशी केल्यावर असे कळले की आमच्या या मित्राची बायको अलिकडे (४-५ वर्षे) हिस्टरीक होते व हिंसक बनते. मला उत्सुकता निर्माण झाली आणि अंदाज केला की पत्रिकेत चंद्र-प्लुटॊचा केंद्र अथवा अर्धकेंद्र योग असला पाहिजे. त्यावर मी माझ्या मित्राला फोनवरून या जोडप्याची जन्मतारीख इ. माहिती मागवायला सांगितले. ती अशी -

बायको नवरा
जन्म- ४ सप्टे १९७५ १८ जुलै १९७३
वेळ - १०-५५ रात्र ११-१५ सकाळी
स्थळ - मुंबई पुणे


या जोडप्यात बायकोच्या पत्रिकेत चंद्र-प्लुटॊ अर्धकेंद्र हा योग असून शनीच्या भ्रमणात म्हणजे साडेसातीत तो तीव्रफलदायी बनला.

पत्रिकामेलन या अंगाने विचार करण्यासाठी वरील जोडप्याचे उदाहरण अतिशय उत्तम आहे. शिवाय शनी-नेपचूनचा मध्यबिंदू जन्मरवीशी अर्धार्धकेंद्र योग करतो जो चिकट आजारपण दाखवतो. पण याचा विचा्र पुढे कधितरी...

रविवार, १५ मार्च, २००९

एबर्टिनचे मध्यबिंदू ज्योतिष- ३ (क्रमश:)

एबर्टिनच्या मध्यबिंदू जोतिषाचा अभ्यास करण्यासाठी काही उपयुक्त साधने

पूर्वी, म्हणजे संगणक नसताना, एबर्टिनच्या मध्यबिंदू जोतिषाचा अभ्यास कागदावर गणिते करून केला जायचा. आता संगणक उपलब्ध झाल्याने त्यातला किचकटपणा आता गेला आहे. म्हणून मध्यबिंदू ही कल्पना समजल्यावर योग्य सॉफ्टवेअरच्या मदतीने हे तंत्र आपल्याला अभ्यासता येईल.

मध्यबिंदू ज्योतिषाचा आज अनेक व्यावसायिक सॉफ्ट्वेअरमध्ये समावेश केलेला आहे. मी स्वत: Janus 4.1 हे सॉफ्ट्वेअर वापरतो पण त्याची किंमत खूप ($150/ फक्त) आहे. म्हणून सुरुवातीच्या अभ्यासाला उपयोगी अशी काही उदार व्यक्तीनी फुकट उपलब्ध करून दिलेली साधने वापरणे योग्य ठरेल.

ऍलन एडवॉलचे ऍस्ट्रोविन (Astrowin) हे सॉफ्ट्वेअर फुकट असून या अभ्यासासाठी
उत्तम आहे. त्याची लिंक इथे देत आहे -
http://www.softpedia.com/get/Others/Home-Education/Astrowin.shtml

याशिवाय आणखी एक् सॉफ्टवेअर पाश्चात्य ज्योतिष-अभ्यासकांत खूप प्रसिद्ध आहे. त्याचे नाव Astrolog. हे सॉफ्टवेअर पण फुकट उपलब्ध असुन या http://www.astrolog.org/astrolog.htm लिंकवरून उतरवून (डाउनलोड करून) घेता येईल. Astrolog मध्ये मध्यबिंदूची प्राथमिक गणिते करून मिळतात. या सॉफ्ट्वेअरवर अवलंबून असणार्‍याना एबर्टिन-तंत्र अधिक सुलभपणे अभ्यासता यासाठी मी स्वत: एक सॉफ्टवेअर १९९९ साली लिहीले. ते त्याच्या मॅन्युअलसह http://www.geocities.com/hollywood/academy/7519/hamw3.0.zip या लिंकवर फुकट उपलब्ध करून दिले आहे.

याशिवाय या तंत्राची अभ्यासकांना उपयुक्त चर्चा खालील वेबसाईटवर उपलब्ध आहे -

१. http://astromedicine.com/health.htm
२. http://www.cosmoastrology.com/
३. http://junojuno2.tripod.com/
४. http://members.tripod.com/~junojuno2/urast.htm
५. http://www.uranian-institute.org/uranbiblio.htm

मंगळवार, १० मार्च, २००९

एबर्टिनचे मध्यबिंदू ज्योतिष - २ (क्रमश:)

मध्यबिंदू कसे काढतात?


मागच्या लेखात मी राशी-भाव कल्पनांना तार्किक आधार नाही असे विधान मी केले होते. ते बर्‍याच जणाना आवडले नसायची शक्यता आहे. पण आज मध्यबिंदू या कल्पनेचा परिचय करून घेतल्यावर ते आपल्याला समजावून घेता येईल.

मध्यबिंदू ही कल्पना पत्रिका मांडायच्या पाश्चात्य पद्धतीच्या मदतीने जास्त चांगली समजते. पाश्चात्य पद्धतीच्या गोलाकार मांडणीत पत्रिकेतील प्रत्येक अंश स्पष्ट मांडता येतो. त्यामुळे योग (aspects) अत्यंत व्यवस्थित दाखवता येतात. तसेच राशींचे आणि भावांचे आरंभ आणि अंत पण व्यवस्थित कळतात. दोन किंवा अधिक पत्रिका एका वेळेस बघून त्या जुळतात की नाही व गोचर भ्रमणांचे जन्मग्रहांशी होत असलेले योग हे पण बघणे अतिशय सोपे होते.

साहजिकच कोणतीही दिशाभूल होण्यास आणि त्यामुळे भाकित चुकण्यास पाश्चात्य पद्धतीच्या गोलाकार मांडणीत कमीत कमीत वाव असतो. खाली दिलेल्या आकृतीवर टिचकी मारल्यास पाश्चात्य पद्धतीची पत्रिका मोठी करून बघता येईल.


आकृती .

गोलाकार पत्रिकेत ग्रह आणि राशी लिहिण्यासाठी चिन्हांचा वापर करतात. ही चिन्हे माहिती असणे या साठी आवश्यक आहे. ही चिन्हे आंतरराष्ट्रीय प्रमाण म्हणून मान्यता पावली आहेत. ही चिन्हे खरे ज्योतिषीच समजतात. मुहूर्त काढणारे भिक्षुक ही चिन्हे समजू शकत नाहीत. त्यांना ज्योतिष किती कळते हाही एक मॊठा प्रश्नच आहे.

मध्यबिंदू काढायच्या दोन पद्धती आहेत एक म्हणजे गणिताने आणि दूसरी म्हणजे भूमितीने (यात कागदावर पत्रिका मांडून ग्रह मांडले जातात व मध्यबिंदू काढले जातात.)

आकृती


समजा एका पत्रिकेत रवि ० अंश मेष असा आहे आणि चंद्र ० अंश तूळ राशीत आहे तर रवि आणि चंद्र यांचा मध्यबिंदू काढण्यासाठी ग्रहांचे अंश-राशी पूर्ण अंशात लिहिले जातात. येथे रविचे पूर्ण अंश ० येतात तर चंद्राचे पूर्ण अंश १८० येतात.

चंद्राचे आणि रविचे अंश या दोन्ही अंशांची बेरीज केली करून दोनाने भागले तर जो भागाकार येतो तेथे रवि-चंद्राचा मध्यबिंदू मिळतो. त्यात १८० अंश मिळवले असता आणखी एक मध्यबिंदू मिळतो.

वर आकृती ब मध्ये मंगळ-हर्षल हा मध्यबिंदू १९ अंश ३८ कला मीनेत आहे. या मध्यबिंदूशी रवीची युति होत आहे. गुरू-नेपच्यूनच्या मध्यबिंदूशी पण रवीची युति होत आहे.

कागदावर मध्यबिंदू काढायची पद्धत सध्या संगणकामुळे वापरली जात नाही. ग्रहांचा असा मध्यबिंदू काढल्यानंतर होणारा सर्वात मोठठा फायदा म्हणजे हे मध्यबिंदू ग्रह (राहू-केतूंसारखे) म्हणून वापरता येतात. कारण या बिंदूना पण ग्रहांप्रमाणे आवर्तन (भ्रमणकाल) असते. हे बिंदू वक्री ग्रहांप्रमाणे वक्री आणि मार्गी होतात या आवर्तनातून दोन ग्रहांच्या जोडीचे गुणधर्म आणि त्यांचा पत्रिकेतील आणि जातकाच्या आयुष्यातील आविष्कार तपासता येतो.

लग्न, ख-मध्य (दशमभाव आरंभबिंदू), ते प्लुटॊ पर्यंत एकंदर ७८ मध्यबिंदू पत्रिकेत तयार होतात. प्रत्येक बिंदूचा मानसिक, शारीरिक व सामाजिक पातळीवर आविष्कार होत असतो. याचे खुलासेवार अर्थ एबर्टिनने आपल्या कोझी (Combination of Stellar Influences) या पुस्तकात दिले आहेत.

क्रमश:

मंगळवार, ३ मार्च, २००९

एबर्टिनचे मध्यबिंदू ज्योतिष-१

भारतीय ज्योतिषांच्या भविष्यकथनाच्या काही खोडी आहेत. त्यापैकी एक खोड म्हणजे ज्या गोष्टीला 'भारतीय' असे लेबल डकवता येईल अशा सर्व गोष्टींविषयी कमालीचा दूरभिमान. भारतीय ज्योतिषापलिकडे ज्योतिषाची अनेक प्रभावी तंत्रे आहेत याचे आपल्या ९९% ज्योतिषांना भानच नसते. त्यामुळे त्यांचा वापर तर दूरच... असो.

आजपासून मी अशाच एका ज्योतिषातील तंत्राविषयी लिहीणार आहे. हे तंत्र पश्चिमेत ज्योतिष अभ्यासकांत अतिशय प्रसिद्ध आहे. भारतीय ज्योतिषांनी मात्र त्याची दखल घेतलेली नाही. या तंत्राच्या अनुषंगाने कोणताही अभ्यास, चर्चा होताना इथे दिसत नाही. फार काय या लोकप्रिय ज्योतिष-तंत्रासंबंधीची पुस्तके भारतात अजून मला बघायला पण मिळालेली नाहीत.

पारंपरिक ज्योतिषांतील अनेक वादग्रस्त कल्पनांना बाजूला करून ज्योतिषातील 'ग्रहांच्या भौमितिक रचना' या मध्यवर्ती कल्पनेचा विस्तार करणारे "मध्यबिंदू ज्योतिष" हे आल्फ्रेड विटे आणि राईनहोल्ड एबर्टिन या दोघा जर्मन ज्योतिषांनी विकसित केले.

१८७८ साली जन्माला आलेला आल्फ्रेड विटे व्यवसायाने सर्व्हेअर आणि हौशी आकाश-निरीक्षक होता. त्याने १ल्या महायुद्धात भाग घेतला होता. लढाईच्या धुमश्चक्रीत तो सैन्याच्या हालचालींची भाकीते वर्तवत असे. त्याची बरीचशी भाकीते चुकू लागल्यामुळे त्याने ज्योतिषातील प्रचलित कल्पना तपासायला सुरुवात केली. ज्योतिषात प्रचलित असलेली 'योग' ही कल्पना संकुचित असल्याचे त्याच्या लक्षात आले आणि त्याने 'मध्यबिंदू' आणि काही काल्पनिक ग्रहांची कल्पना मांडली. त्यापैकी मध्यबिंदू ही संकल्पना अनेकजणानी सखॊल अभ्यास केल्यामुळे जास्त प्रसार पावली. याला मोठा हातभार डॉ राईनहोल्ड एबर्टिनने लावला.
डॉ राईनहोल्ड एबर्टिन

डॉ राईनहोल्ड एबर्टिन हा स्वत: एक (माणसांचा) डॉक्टर होता. माणसाच्या आयुष्यात दिसून येणार्‍या अनेक चक्रीय घटनांनी त्याला आकाशस्थ ग्रहांच्या भ्रमणांशी सांगड घालण्यास प्रवृत्त केले. पारंपरिक ज्योतिषात वापरल्या जाणार्‍या अनेक कल्पना - उदा. भाव, राशी या भ्रांत (किंवा अ-वास्तव!) कल्पना आहेत असे त्याचे मत होते. कारण, सायन आणि निरयन ही दोन राशीचक्रे प्रचलित ज्योतिषात वापरली जातात. एकंदर भाव पद्धतींची संख्या १५ पेक्षा जास्त आहे. असे असताना कोणती भाव पद्धत वापरायची? बरे जी फलादेश करण्यास उपयोगी पडते ती वापरायची असे जरी मानले तरी ज्योतिषाकडे येणार्‍या प्रत्येक जातकासाठी प्रत्येकवेळेस सर्व भावपद्धती तपासणे व्यवहार्य नसते. कालनिर्णयाबाबत वापरण्यात येणार्‍या 'दशा' पद्धती बद्दल असेच सांगता येइल. दशा पद्धतीला कोणताही वास्तव आधार नाही. केवळ अनुभव येतो या भाबड्या समजुतीमुळे 'दशा' वापरल्या जातात. आमच्या ऋषीना जास्त अक्कल होती ही अशीच एक भारतीयांची भाबडी समजूत 'दशा' जीवंत राहण्यास कारणीभूत ठरली आहे. परिणामत: लहान मुले जशी बर्‍याचवेळा चुकीची पद्धत वापरून गणितांची बरोब्बर उत्तरे काढतात, त्याप्रमाणेच दशा पद्धतीच्या अचूक भाकीतांबद्दल सांगता येईल. ज्योतिषातील अ-व्यवहार्य कल्पना टाकून दिल्यावर, संकल्पनांची पुनर्बांधणी करून ज्योतिषाची उपयुक्तता वाढवता येईल का याचा विचार राईनहोल्ड एबर्टिनने केला.
कित्येक हजार पत्रिकांचा अभ्यास केल्यावर त्याच्या असे लक्षात आले की


० केवळ युति, केंद्रादि योग मानवी जीवनातील घटनांचा मेळ घालण्यास पुरेसे पडत नाहीत.
० भाव, राशी या कल्पनाना तार्किक आधार नाही
० ग्रहांच्या विशिष्ट रचनानी पत्रिकेत अन्यत्र संवेदनशील बिंदू (sensitive points) तयार होतात. हे बिंदू ग्रहांच्या गोचर भ्रमणांनी सक्रिय होतात तेव्हा तदानुषंगिक ग्रहांच्या तत्त्वानुसार घटना घडायची शक्यता असते.

एखाद्या भौमितिक रचनेत अंतर्भूत होणार्‍या ग्रहांच्या समूहाचा एकत्रित विचार हे एबर्टीनच्या तंत्राचे मोठ्ठे बलस्थान! एखाद्या लज्जतदार पाककृतीची चव जशी त्यामध्ये वापरलेल्या मसाल्यातील घटकांवर अवलंबून असते त्याप्रमाणे आयुष्यात घडणार्‍या घटनेत वेगवेगळी बीजतत्त्वे (key principles) प्रकट होतात. या तत्त्वांचा एकत्रित विचार ग्रहांच्या बीज-तत्त्वाना एकत्र मांडून करता येतो आणि संभाव्य घटनेच्या स्वरुपाची रचना करता येते.

कोणतेही तंत्र योग्य साधनांशिवाय पूर्णपणे उपयोगात आणता येत नाही. ग्रहांच्या समूहाचा एकत्रित विचार अचूक पणे करण्यासाठी "९० अंश- तबकडी" (90 degree dial) आणि एखाद्या कालावधीतील ग्रहांच्या भ्रमणांचा विचार करण्यासाठी "४५ अंश आलेखीय पंचांग" (45 degree graphical ephemeris) या दोन साधनांची पण एबर्टीनने निर्मिती केली. आज संगणकाच्या उपलब्धतेमुळे ही दोन्ही साधने जास्त परीणामकारकपणे वापरता येतात.

आपल्या तंत्राचा अभ्यास सोपा व्हावा यासाठी एबर्टीनने अनेक पुस्तके लिहिली. त्यातील The Combination of Stellar Influences हे पुस्तक "कोझी" या नावाने पश्चिमेतील ज्योतिर्विदांमध्ये प्रसिद्ध आहे. मध्यबिंदू ज्योतिष नव्याने अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्याला या पुस्तकामुळे लीलया आत्मसात करता येते.

कोणत्याही गूढ गोष्टीना (अंतर्ज्ञान, साधना, गुरुकृपा) थारा नसल्यामुळे एबर्टिनचे मध्यबिंदू ज्योतिष झपाट्याने लोकप्रिय झाले. आजही भारतात याचे अभ्यासक तर जेमतेम मूठभरच असतील. ज्योतिषाचे मराठी अभ्यासक या तंत्राच्या अभ्यासाला प्रवृत्त झाले तर एकंदरच ज्योतिषाची कुचेष्टा कमी होण्यास मदत होईल अशी आशा वाटते.

राजीव उपाध्ये
ईमेल - upadhye.rajeev@gmail.com

शुक्रवार, ६ फेब्रुवारी, २००९

Social Cohesion and Human Nature या बर्ट्राण्ड रसेलच्या निबंधाचा स्वैर अनुवाद

टीप - निसर्गाचे नियम समाजाच्या नियमांपेक्षा नेहमीच श्रेष्ठ असतात. निसर्गाला दडपायचे असेल तर माणसाला फार मोठी किंमत मोजावी लागेल. हा या रसेलच्या निबंधातील गर्भित इशारा मला खूप भावला म्हणून मी त्याचा अनुवाद करायचा प्रयत्न केला आहे. हा निबंध वाचताना आजच्या संदर्भांच्या अनुषंगाने काही विचार डोक्यात आले ते तळटीपा म्हणून दिले आहेत. या टीपा मूळ निबंधात नाहीत. - राजीव उपाध्ये

मानवासहित सर्व समाजप्रिय प्राण्यामध्ये सहकार आणि एकी या पायाभूत प्रेरणा आहेत. मुंग्या आणि मधमाशांमध्ये या प्रेरणा पूर्णत्व पावलेल्या दिसतात. या कीटकांमध्ये समाजविरोधी कृती करण्याची प्रवृत्ती दिसून येत नाही. ते आपल्या घरट्याशी किंवा पोळ्याशी पूर्णपणे एकनिष्ठ असतात. एका मर्यादेपर्यंत या सार्वजनिक कर्तव्याचे, एकनिष्ठतेचे कौतुक वाटणे स्वाभाविक आहे. पण त्यात एक मोठ्ठी त्रुटी आहे. ती अशी की, मुंग्या आणि माशा उत्तम कलानिर्मिती करत नाहीत. शास्त्रीय शोध पण हे कीटक लावत नाहीत. फार काय, सर्व मुंग्या किंवा माशा या भगिनी आहेत, अशा विचारसरणीवर आधारित धर्माची रचना पण त्यांनी केलेली दिसत नाही. वस्तूत: त्यांचे समाजजीवन हे स्थिर, यांत्रिक आणि अतिशय अचूक असते. आपण माणसे (म्हणूनच) इच्छा करतो की, जीवनात थोडी तरी अस्थिरता असावी, जेणे करून उत्क्रांतीमधिल अशा अडथळ्यांपासून आपली सुटका होईल.

फार पूर्वी मानवप्राणी हा दूर्बळ आणि दूर्मिळ असा होता. त्याचे अस्तित्व अतिशय डळमळीत होते. काळाच्या ओघात त्याचे पूर्वज झाडांवरून खाली आले आणि घट्ट पकडीचे पंजे सोडून हात आणि पाय वापरू लागले. या बदलांचा फायदा असा झाला की, मनुष्यप्राण्याचे अस्तित्व जंगलांपुरते न राहता मोकळ्या प्रदेशात, जिथे आफ्रिकेतील उष्णकटिबंधातील जंगलांच्या तुलनेने अन्न कमी प्रमाणात होते, तिथे वाढायला लागले. सर आर्थर कीथ यांच्या अंदाजानुसार एका मनुष्यप्राण्यास सुमारे २ वर्गमैल इतका भूप्रदेश अन्नाची गरज भागविण्यास आवश्यक असे. मनुष्य सदृश माकडे (anthropoid ape) आणि काही अजूनही अस्तित्व टिकून असलेल्या आदिम जमातींच्या निरीक्षणावरून, आपले पूर्वज ५०-१०० च्या कळपामध्ये राहत असावेत. आपल्या कळपामध्ये एकोपा, सहकार्य आणि दूसर्‍या कळपाशी गाठ पडल्यास वैर असे या मनुष्य प्राण्यांचे वर्तन असे. जोपर्यंत मनुष्यप्राणी दूर्मिळ होता तोपर्यंत दोन कळपांची गाठ पडणे तसे अकस्मातच घडून येई. प्रत्येक कळपाचा वावर विशिष्ट प्रदेशापुरता मर्यादित होता. दोन कळपांमधला संघर्ष अशा प्रदेशाच्या हद्दीवर घडत असे. याकाळात प्रजोत्पादन हे कळपापुरतेच सहसा मर्यादित होते. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात आंतरजनन (inbreeding) तेव्हा झाले असणार. प्रजोत्पादनाच्या निर्माण झालेल्या चालीरीती कळपामध्ये तशाच पुढे चालू राहिल्या असणार. एखाद्या कळपाचा आकार जसा वाढत जाई, तेव्हा जागा अपुरी पडायला लागल्यावर तो कळप अन्य कळपांच्या संपर्कात येत असे. अशा वेळेस दोन कळपांमध्ये संघर्ष निर्माण होऊन आंतरजननामुळे फायदा मिळालेला सामर्थ्यशाली कळप आपल्या चालीरीती पुढे चालू ठेवत असे. सर आर्थर कीथ यांनी आपल्यासमोर हे सर्व अतिशय खुलासेवार मांडले आहे. आता हे ओघानेच आले की आपले रानटी पूर्वज कोणतेही विचारपूर्वक धोरण न स्वीकारता, केवळ सहज प्रेरणेने, आपल्या कळपाशी निष्ठा आणि दूसर्‍या कळपाचा तिरस्कार किंवा वैर, असे परस्परविरोधी वर्तन करत असत. [१,२]

या काळात निर्माण झालेला सर्वात ताकदवान आणि सहजप्रेरणेने प्रवृत्त असा गट म्हणजे कुटुम्ब होय. प्रदीर्घ बाल्यावस्थेमुळे मनुष्यप्राण्यात कुटुम्बसंस्थेची निर्मिती झाली. अन्न गोळा करण्यावर स्त्रीच्या पालनपोषणाच्या जबाबदारीमुळे मर्यादा आल्या. याचवेळेस, मनुष्यप्राण्याने पक्ष्यामध्ये दिसते त्याप्रमाणे पिता या घटकाचा कुटुम्बात अंतर्भाव केला, आणि पालनपोषणाच्या श्रमांची विभागणी या टप्प्यापासून सुरू झाली. कुटुम्ब ते जमात हे स्थित्यंतर शिकार करताना, सहकार्याचे महत्त्व मनुष्यप्राण्यास जसे उमगत गेले तसे घडत गेले. तसेच टोळीमधला एकोपा अन्य टोळ्यांशी अचानक संपर्कामुळे निर्माण होणार्‍या संघर्षातून वाढत गेला. [३]

मर्कटमानव ते आदिमानव या उत्क्रांतीमधिल टप्पे आज उपलब्ध असलेल्या अवशेषांवरून पुरेसे स्पष्ट होतात. आज सापडलेले मानवाचे सर्वात जुने अवशेष सुमारे एक कोटी वर्षांपूर्वीचे आहेत. त्यापूर्वी काही कोटी वर्षांपूर्वी मर्कटमानवाने वृक्ष सोडून जमिनीवर संचार करण्यास सुरुवात केली. उत्क्रांतीमधिल टप्प्यांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मानवाच्या मेंदूचा आकार वाढत जाउन तो सध्या आहे त्या स्थितीपर्यंत कित्येक हजार वर्षांपूर्वी स्थिरावला. या हजारो वर्षांत माणसाचे ज्ञान, कौशल्ये, सामाजिक जडणघडणीचा विकास झाला, पण तस बघितलं तर जन्मजात बौद्धिक क्षमतेचा विकास मात्र तेवढा झालेला दिसत नाही. बौद्धिक क्षमता वाढीची प्रक्रिया काही हजार वर्षांपुर्वी थांबल्याचे आढळून येते. आपण जे शिकतो ते अश्मयुगीन मानवापेक्षा काही फार वेगळे आहे असे मानायचे काही कारण देता येत नाही [४]. ज्या प्रेरणानी आदिमानवाला आपल्या टोळीपुरता एकोपा आणि बाहेर इतरांशी वैर असे वर्तन करायला लावले, त्या प्रेरणा आजही अस्तित्वात आहेत. जे वर्तनातील बदल सुरुवातीच्या काळापासून होत आले आहेत ते पण एकतर सहजप्रेरणेने आहेत किंवा जाणीवपूर्वक समूहस्वार्थापोटी आहेत. मानवी सामाजिक जीवनात ताणतणावास कारण ठरणारी एक महत्त्वाची गोष्ट अशी की, एका ठराविक मर्यादेपर्यंतच ज्याला नैसर्गिक प्रेरणा नाहीत अशा वर्तनाला विवेकाच्या चौकटीतून जाणून घेता येते. ज्या वर्तनाने नैसर्गिक प्रेरणेवर ताण पडतो, तेव्हा निसर्ग अतिशय थंडपणा किंवा विध्वंस याद्वारे सूड काढतो, जेणेकरून विवेकाने प्रेरित रचना मोडून पडते.

सामाजिक एकोप्याची सुरुवात समूहनिष्ठेतून होते. शत्रुभयाने त्याची गरज अधोरेखित होते. नैसर्गिक आणि जाणीवपूर्वक प्रक्रियांतून सामाजिक एकोप्याचा आज आपल्याला ठाऊक असलेल्या 'राष्ट्र' संकल्पनेपर्यंत विकास झाल्याचे जगभर दिसून येते. या विकास प्रक्रियेत अनेक प्रवाह मिसळले गेले आहेत. सुरुवातीला समूहाच्या नेत्याशी निष्ठा म्हणजे समूहनिष्ठा असे मानले गेले. एखाद्या टोळीचा प्रमुख किंवा राजा त्या टोळीच्या सर्व सदस्याना ओळखत असे. अशा प्रकारे समूहनिष्ठे ऐवजी व्यक्तीनिष्ठेने, मूळ प्रेरणेला धक्का न लागता, टोळ्यांचा आकार वाढायला मदत झाली.

विकासाच्या पुढील टप्प्यात अस्तित्व पुसून टाकणार्‍या लढाया हळुहळु जय-विजयाच्या लढाया बनल्या. पराभूतांना मृत्युदंड देण्याऐवजी गुलाम म्हणून ठेवणे त्यांच्या जेत्यांनी पसंत केले. हे झाले तेव्हा टोळीत दोन प्रकारचे लोक दिसू लागले. ते म्हणजे, मुक्त असलेले टोळीचे मूळ सदस्य आणि केवळ भीतिपोटी आणि इच्छेविरूद्ध त्यांच्या आज्ञा पाळणारे गुलाम. निनव्हा[५] आणि बॅबिलोनची सत्ता खुप मोठ्या प्रदेशावर पसरली होती. ही सत्ता त्याप्रजेच्या स्वयंप्रेरणेने किंवा सामाजिक एकोप्याच्या भावनेतून निर्माण झाली नव्हती तर जेत्यांच्या युद्धसामर्थ्याने निर्माण झालेल्या दहशतीतून होती. त्या काळापासून युद्धाने टोळीचा किंवा जमातीचा आकार वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भीतीने एकजुटीच्या भावनेवर विजय मिळविला. हा बदल फक्त मोठ्या जमातींपूरता मर्यादित नव्हता तर स्पार्टासारख्या ठिकाणी जिथे मुक्त नागरिक संख्येने कमी होते तिथे हेलट समाजाचे लोक निष्ठूरपणे दडपले गेले होते. स्पार्टाची सामाजिक एकोप्यासाठी कायम प्रशंसा केली गेली आहे पण हा एकोपा, दहशतीने निर्माण केलेल्या निष्ठेचा अपवाद वगळता, स्पार्टाच्या संपूर्ण लोक समुदायासाठी कधीच नव्हता.

नंतर मानवी संस्कृतीचा विकास होत असताना निष्ठेचे नवे रूप अस्तित्वात आले. ही निष्ठा एखाद्या भूप्रदेशाच्या ओढीतून किंवा वांशिक साधर्म्यावर आधारलेली नव्हती तर विचारसरणीवर आधारीत होती. पश्चिमेपुरते बोलायचे झाले तर ऑर्फिक संप्रदायात गुलामाना समान दर्जा मिळाला होता, तिथे या नव्या निष्ठेचा उगम झालेला दिसतो. त्यांच्या शिवाय धर्मसंस्था, राजसत्तेच्या इतक्या जवळ होती की धर्माच्या अनुयायांचे पंथ पण रानटी टोळयांच्या धर्तीवर विकास पावले. हळुहळु सांप्रदायिक ओळख ही खूप ताकदवान बनत गेली. इस्लामने ७व्या, ८व्या शतकात जिंकलेल्या लढायांवरून हेच सिद्ध होते. धार्मिक युद्धाना खतपाणी या नव्या निष्ठेतून मिळाले. सोळाव्या शतकात धार्मिक/दैवतवादी निष्ठा राष्ट्रीय निष्ठेपेक्षा श्रेष्ठ बनल्या. सध्या वैचारिक निष्ठा मात्र दोन मोठ्या गटात गेल्या आहेत. त्यातली पहिली म्हणजे साम्यवादी विचारसरणीची 'पवित्र ग्रंथा'[६] वरील निष्ठा आणि दुसरी म्हणजे अमेरीकन जीवन पद्धतीवरील निष्ठा. स्थलांतरीतांनी जन्माला घातलेल्या अमेरीकेला जैविक एकता नाही, पण तेथिल एकतेची भावना युरोपिअन राष्ट्रांप्रमाणेच तीव्र आहे. अब्राहम लिंकनने म्हटल्याप्रमाणे अमेरीका 'प्रमेया'शी एकनिष्ठ आहे. अमेरीकेचे स्थलांतरीत आपल्या युरोपातील मूलस्थानांबद्दल नेहमीच झुरत असतात तर त्यांची पुढची पिढी मात्र आपली अमेरीकन जीवनशैली वैश्विक व्हावी असा ठाम विश्वास बाळगून आहे. अमेरीकेत आणि रशियात वैचारिक आणि राष्ट्रीय एकता यातील भेद नाहीसा झाल्याने दोन्ही विचारसरणींमध्ये नवी ताकद निर्माण झाली. या स्पर्धक विचारसरणींचे आकर्षण मात्र भौगोलिक सीमा पार करून गेले आहे.

आधुनिक काळातील ज्या सांप्रदायिक निष्टा आपल्याला व्यक्तीगत पातळीवर समाधान देत असतात, त्यांचे स्वरूप प्राचीन काळातील टोळ्यांमध्ये विकास पावलेल्या मानसिक जडणघडणीप्रमाणेच असते. अजूनही जन्मजात मनुष्यस्वभाव, शालेय शिक्षण, धर्म, आर्थिक विचारसरणीचा प्रचार यांचा फारसा प्रभाव न पडता, आजच्या मेंदूच्या विकासपूर्व अवस्थेतील स्वभावाशी मिळताजुळता आहे. अगदी सहजपणे आपण मानवीसमाजाची मित्र-शत्रु अशी विभागणी करतो. मित्रांच्या बाबत आपली नीति सहकार्यावर आधारलेली असते तर शत्रूंच्या बाबतीत आपली नीति स्पर्धेवर आधारित असते. पण ही विभागणी सतत बदलत असते. एका क्षणापर्यंत स्पर्धक असलेले दोन व्यावसायिक काही आह्वान निर्माण होऊन अस्तित्व धोक्यात आले तर एकत्र येतात आणि एकमेकांकडे बंधुभावाने बघू लागतात. कुटुम्बाच्या सीमारेषेबाहेर पडल्यावर शत्रू हा नेहमी एकीला कारणीभूत ठरलेला मोठा घटक आहे.

जागतिक पातळीवर एकीकरणाचे प्रयत्न सफल का होत नाहीत याचे कारण आता स्पष्ट होईल. एक वैश्विक राष्ट्र, जर अस्तित्वात आणले गेले, तर शत्रू नसल्यामूळे मोडून पडायचीच शक्यता आहे. दोन थोर धर्मांनी - ख्रिश्चन आणि बौद्ध - आपल्या अनुयायांद्वारे बंधुभाव संपूर्ण मानवजातीपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. बंधुत्वाचा पुरस्कार करून माणसामाणसातील दरी संपवण्याचा प्रयत्न या दोन धर्मांनी केला आहे [७]. आपण सर्व माणसे परमेश्वराची लेकरे आहोत म्हणून आपण एकाच कुटुंम्बाचे घटक आहोत. पण ज्यांनी हा विचार स्वीकारला नाही त्यांना ते परमेश्वराची लेकरे नाहीत असे मानून, प्राचीन टोळ्यांच्या अपपरभावाच्या मानसिकतेने, वैरी बनवले गेले. यात मूळ भावनेला (आपण सर्व माणसे परमेश्वराची लेकरे आहोत) तडा गेला.

धर्म, नीति, आर्थिक हितसंबंध आणि अस्तित्वाचा लढा यातून आपल्याला वैश्विक सहकाराचे समर्थन करून निरुत्तर करणारा युक्तिवाद पुढे करता येतो पण आपल्या जुन्या रानटी पूर्वजांच्या जैविक प्रेरणा अधूनमधून डोके वर काढतात. कदाचित जीवन बेचव होण्याच्या भीतीने आपण वैर, तिरस्कार सोडून द्यायला तयार होत नाही. संपूर्ण मानवजातीची एकी आपल्याला जर साधायची तर अंशत: कायद्याने आणि अंशत: मानवी आदिम भावनाना न दबवता त्यांचा निचरा होईल असे अभिनव मार्ग शोधूनच ते साध्य होईल.

हा प्रश्न सोडवणे सोपे नाही आणि केवळ नैतिकतेच्या मदतीने तर अजिबातच नाही. भरपूर गवागवा झालेल्या मनोविश्लेषण तंत्राने एक मौल्यवान सत्य आपल्या समोर आणले आहे. एक जुनी म्हण आहे की निसर्गाला चिमट्याने उचलून जरी बाजूला केले तरी तो परत प्रकट होतोच [८]. याचे सर्वात सुलभ स्पष्टीकरण मनोविश्लेषणाखेरीज दूसरे कोणतेही तंत्र आपल्याला देऊ शकत नाही. नैसर्गिक प्रेरणांच्या एकदम विरूद्ध जाणारे जीवन हे अत्यंत तणावकारक असते [९]. एका मर्यादेपलिकडे अनैसर्गिक जीवन जगणारे लोक हे मत्सर, द्वेष इत्यादि भावनानी ग्रासले जातात. काही वेळा त्यांचा जगण्यातला उत्साह संपून जातो. काही वन्यजमाती जेव्हा अचानक आधुनिक सुसंस्कृत समाजाच्या संपर्कात आल्या तेव्हा हे निरीक्षण करण्यात आले. श्वेतवर्णीयांनी पापुआतील नरभक्षक जमातीना त्यांच्या शिकारक्रीडेपासून जेव्हा वंचित ठेवले तेव्हा या जमातीतील लोकांमधिल चैतन्य संपुष्टात आल्याचे मानववंशशास्त्रज्ञांनी नोंदवून ठेवले आहे [१०]. या नरभक्षकांनी त्यांच्या हिंस्र चालीरीती पूर्ण बंद कराव्यात असे मला म्हणायचे नाही पण या चालीरीतींच्य जागी या लोकाना दूसरा पर्याय मनोवैज्ञानिकांनी द्यावा एवढेच मला सूचवायचे आहे. सुसंस्कृत मनुष्य हा पापुआतील नरभक्षकांप्रमाणे सद्प्रवृत्तीचा बळी ठरलेला असतो. आपल्यामध्ये सर्व प्रकारच्या आक्रमक प्रवृत्ती असतात तसेच रचनात्मक प्रेरणा पण असतात. समाज त्या दडपून टाकतो आणि जे पर्याय कुस्ती आणि फुट्बॉल मॅचच्या रुपात पुढे येतात ते अपुरे असतात. ज्यांना कुणाला युद्ध पृथ्वीतलावरुन नाहीसे करायचे आहे त्यांनी आपल्या उपजत नैसर्गिक प्रेरणांचे काय करायचे याचे उत्तर शोधायला हवे. माझ्यापुरते बोलायचे झाले तर मी हेरांच्या चातुर्यकथा वाचून माझ्या प्रेरणांना वाट देत असतो. त्या वाचत असताना मी आलटुन पालटुन गुन्हेगार आणि पोलीस या भूमिका वठवतो आणि तेवढ्याने माझे भागते. पण अशी काही माणसे आहेत की त्यांच्यासाठी हे फारच सौम्य आहे.

सामान्य माणसे स्पर्धेशिवाय आनंदी होऊ शकतील असे मला वाटत नाही कारण स्पर्धा ही अनेक मानवी उद्योगांचे मूळ आहे. स्पर्धा थांबवणे हे आपले ध्येय न ठेवता ती हानीकारक कशी होणार नाही याकडे लक्ष द्यायला हवे. खेळ आणि कलात्मक आविष्कारातील स्पर्धा या तूलनेने कमी हानीकारक आहेत. त्यातून युद्ध-प्रवृत्तींचा बर्‍याच प्रमाणात निचरा होतो.

युद्धानंतर आधुनिक मानवी संस्कृतीने सुरक्षिततेला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. जीवनातील सर्व धोके आपण बाजूला करू शकलो तर आयुष्यात फारसा आनंद उरेल असे मला वाटत नाही. सर आर्थर कीथ यांच्या New Theory of Human Evolution या पुस्तकातील एक परिच्छेद मला येथे द्यावासा वाटतो.

"जंगल न्यायाखाली जी माणसे जगत आहेत ती अधिक सुखी समाधानी असल्याचे मत अनेक अभ्यासकांनी नोंदवले आहे. फ्रेया स्टार्क यांनी दक्षिण अरेबियातील लोकांना सुरक्षितपणा ठाऊक नाही. पण तरीही ते सुखी आणि समाधानी असतात. डॉ. एच्‌. के. फ्राय यांनी ऑस्ट्रेलियातील आदिम जमातींबद्दल असेच म्हटले आहे. आणखी एक उदाहरण मला अमेरीकेतील क्रो-इंडियन जमातीचे द्यावेसे वाटते. क्रो-इंडियन आता काही प्रमाणात सुरक्षिततेचा अनुभव घेत आहेत. या जमातीचा अभ्यास डॉ. लॉरी करत आहेत. एखाद्या क्रो-इंडियनला आपण जर विचारले की तो धोका आणि सुरक्षितता यात काय पसंत करेल तर धोका हे उत्तर ऐकायला मिळते. माणसाच्या उत्क्रांतीचा फार मोठा काळ जंगली अवस्थेत गेल्यामुळे आजच्या माणसात रक्ताच्या बदल्याची चटक टिकून आहे."

१९१४ साली जेव्हा प्रथम मी याबद्दल वाचले तेव्हा मी तरी आश्चर्यचकीत झालो होतो. बरेच लोक जोपर्यंत झळा बसत नाहीत तोपर्यंत युद्धकाळात जास्त आनंदी असतात. शांत आयुष्य लोकाना कदाचित कंटाळवाणे होत असावे. चांगली वर्तणूक, धाडसशून्य अस्तित्व, आणि पुरेशी कमाई असलेल्या आणि तरी पण असमाधानी असलेल्या नागरीकांना ४००००० वर्षापूर्वी मागे नेऊन ठेवले तर त्यांना अन्नाचा शोध, शत्रूचा शिरच्छेद आणि श्वापदांपासून संरक्षण इत्यादी जीवनक्रम नक्कीच समाधानकारक वाटेल. जेव्हा युद्धाचे वारे वाहू लागतात तेव्हा एखादा कारकून
सैन्यात भरती होऊन, त्याच्या नैसर्गिक प्रेरणांना अनुकूल असे जीवन जगू शकतो. पण आज वैज्ञानिक प्रगतीने अशी काही साधने उपलब्ध झाली आहेत की त्यांच्या मुक्त वापराने उत्क्रांतीचा कोणताही हेतू साध्य होत नाही. आपल्या अनियंत्रित प्रेरणांशी जुळवून घेण्यात असलेल्या प्रश्नांचा पुरेसा अभ्यास झालेला नाही. वैज्ञानिक तंत्र जसे विकसित पावत आहे तशी या अभ्यासाची आवश्यकता वाढत आहे. जैविक बाजूने पाहिले तर असे लक्षात येते की वैज्ञानिक तंत्राची विनाशकारी रूपे ज्या वेगाने विकास पावली त्या वेगाने रचनात्मक रुपांचा विकास झाला नाही. एका घटकेत आज ५००००० माणसे मारता येतात. पण मनुष्य जन्माला यायला लागणारा लागणारा वेळ अजून कमी करता आलेला नाही.

त्यामुळे समाजसुधारकांपुढचा खरा प्रश्न हा सुरक्षिततेची साधने, उपाय शोधणे हा नाही. कारण जेव्हा सुरक्षितपणातून कोणतेही समाधान मिळत नाही तेव्हा लोक धाडसाकडे वळतात. त्यामूळे सुरक्षेची भावना आणि नागरी जीवनास धक्का देणार नाहीत अशा धैर्य, शौर्य आणि स्पर्धा प्रवृत्तीना वाट देणारी योग्य जीवनपद्धती शोधणे हा खरा प्रश्न आहे. आणि हे सर्व करत असताना आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आपली जीवन पद्धती, सामाजिक संस्था, ज्ञान हे सर्व बदलले असले तरीही आपल्या नैसर्गिक प्रेरणा मात्र हजारो वर्षांपूर्वीच्या आपल्या पूर्वजांसरख्याच आहेत. त्यात यत्किंचितही बदल झालेला नाही. हे असाध्य आहे असे मला वाटत नाही. मानववंशशास्त्रातील आजवरचे संशोधन हेच सिद्ध करते की मानवी स्वभाव हा अतिशय लवचिक आहे. मानवी जीवनपद्धतील जगभर दिसणारे वैविध्य हे याचे पुरेसे निदर्शक आहे. एखाद्याच नैसर्गिक प्रेरणेचे पूर्ण उच्चाट्न करुन हे साध्य होईल असे मला वाटत नाही. धाडसाशिवाय आयुष्य हे नीरस असले तरी वाट्टेल ते स्वरूप घेणारे धाडस हे मात्र आयुष्याच्या मूळावरच घाव घालते.

मी पूर्वी उल्लेख केलेल्या रेड इंडियनच्या उदाहरणात या सर्व गोष्टींचा उत्तम परिपोष आढळतो - रेड इंडियनना जुन्या जीवनपद्धतीची ओढ वाटते कारण त्यातच त्याना 'जान' सापडते. प्रत्येक उत्साही माणसाला 'जान' किंवा चैतन्याचा स्रोत म्हणून दाखवता येईल असे आयुष्यात काही हवे असते [११]. काही जणाना हे सर्व मिळते ते बहुधा नट, खेळाडू, सैन्यातील अधिकारी, राजकारणी म्हणून आपल्यापुढे येतात. बाकीच्याना दिवास्वप्ने रंगवत आपले आयुष्य घालवण्याशिवाय पर्याय नसतो. स्वप्ने रंगवणे यात अयोग्य काही नाही; कल्पकपणे जीवन जगण्यासाठी ते आवश्यक असते. पण वास्तवाची आणि स्वप्नांची सांगड घालता आली नाही तर मात्र मॊठ्या समस्याना तोंड द्यावे लागते कारण त्यामुळे मन:स्वास्थ्याला धक्का बसतो. कदाचित आपल्या यांत्रिक जीवनात नैसर्गिक प्रेरणांना वाट देण्याचे मार्ग काढता येणे अजूनही शक्य आहे. तसं जर झालं नाही तर विनाशकारी विचारसरणी माणसाच्या कर्तृत्वावरून केव्हाच बोळा फिरवून मोकळ्या होतील.

टीपा -
[१] मनुष्यप्राणी कितीही पुढारला असला तरीही अनेक जैविकप्रेरणा आधुनिक
मानवामध्ये तश्शाऽच टिकून आहेत. स्वजातीप्रेम, अन्य धर्मांचा द्वेष, तिरस्कार
मराठी-अमराठी वाद ही याच प्रेरणांची आधुनिक रूपे आहेत असे मला वाटते.

[२] जिथे पोषण होते किंवा अस्तित्वाच्या गरजा भागतात तिथे निष्ठा, प्रेम
इत्यादि भावनांचा विकास होतो असे निरीक्षण डेस्मण्ड मॉरीस (Human Zoo ) या
मानववंशशास्त्रज्ञाने मांडले आहे. हे निरीक्षण व्यक्तीपासून समष्टीपर्यंत
सर्वांना लागू पडते.

[३] ब्राह्मणांमध्ये वाढणारा एकोपा हा ब्राह्मणद्वेषातून वाढत आहे. त्यामुळे तो
प्रतिक्रियात्मक स्वरूपाचा आहे. शंकराचार्यांनी केलेली वैदिक धर्माची
प्रतिस्थापना अशीच प्रतिक्रियात्मक स्वरूपाची होती. राष्ट्रीय पातळीवर व्यक्त
होणारी दलितांची अस्मिता आणि जागतिक पातळीवर दिसून येणारी हिंदूची अस्मिता यात
गुणात्मक फरक करता येत नाही असे मत एका प्रसिद्ध मराठी तत्वज्ञाने नोंदवले
आहे. ते कसे याचा येथे खुलासा होतो.

[४] लेव्ही स्ट्रॉस या फ्रेंच मानववंशशास्त्रज्ञाने अशाच स्वरूपाचा युक्तिवाद
आपल्या Primitive Thinking and Civilized Mind या निबंधात केला आहे.

[५] असिरीयन संस्कृतीची राजधानी

[६] तेव्हा 'दास कापिटाल' आणि सोविएत युनियनचे अस्तित्व संपल्यामूळे ही जागा
आता 'पवित्र कुराणा'ने घेतली आहे.

[७] एका तिबेटी बौद्ध पंडिताने निर्वाण या कल्पनेचा सांगितलेला अर्थ मला खूप
भावला. कोणतीही दरी पार करणे किंवा बंधनातून बाहेर पडणे म्हणजेच निर्वाण असे
त्याने म्हटले आहे. निर्वाणाला समांतर असलेली मोक्ष ही भ्रांत कल्पना आहे, तर
निर्वाण हे वास्तववादी आहे. वर्णभेदाने निर्माण केलेली सामाजिक दरी पार करायची
ताकद आणि संधी बुद्धाने दिली म्हणून त्याचा 'धम्म' लोकप्रियतेस पात्र झाला.

[८] हा मुद्दा या निबंधातील परमोच्च बिंदू आहे असे मला वाटते. निसर्गाचे नियम
समाजाच्या नियमांपेक्षा नेहमीच श्रेष्ठ असतात. निसर्गाचे नियम दडपायचे असतील तर
माणसाला फार मोठी किंमत मोजावी लागेल.

[९] आपल्याकडे आचार्य रजनीशांनी हे ओळखले होते. आधुनिक सुसंस्कृत माणसाच्या काम-ऊर्जेचा कोंडमारा लग्नसंस्थेतून कसा होतो हे त्यांनी दाखवून दिले.

[१०] इथे मला माझे स्वत:चे निरीक्षण मांडायचे आहे. जंगली श्वापदे जेव्हा नागरी
संपर्कात येतात तेव्हा त्यांना पकडून पुन्हा 'सन्मानाने' जंगलात पाठवले जाते.
त्यांची शिकार करून उपजीविका करण्याची प्रेरणा नाहीशी होणार नाही याची काळजी
घेतली जाते. पण माणसे मात्र इतर माणसांच्या प्रेरणा आपल्या नियंत्रणाखाली
आणायच्या उद्योगात गुंतलेली असतात.

[११] धन, प्रतिष्ठा, अनुरूप जॊडीदार हे आधुनिक सामान्य माणसाच्या आयुष्यात
चैतन्य आणतात.

बुधवार, २१ जानेवारी, २००९

वास्तूचे लाभणे

वास्तूचे लाभणे

लोक जिवाच्या कराराने स्वत:च्या मालकीच्या वास्तूचे स्वप्न वास्तवात आणण्यासाठी
झगडतात. हे स्वप्न पुरे झाले की नव्या वास्तुमध्ये स्थलांतरीत होतात, पण कधी
कधी नव्या वास्तूत स्वास्थ्य लाभण्या ऐवजी जुने नष्ट्चक्र चालूच राहते. मग कुणी
तरी सांगते ही वास्तू तुम्हाला लाभत नाही. अमुक करून बघा, तमुक करून बघा.

वास्तू न लाभणे या प्रकाराचे निरीक्षण केल्यावर माझ्या लक्षात आलेल्या काही ठळक
गोष्टी अशा -

- घरातील एकाच व्यक्तीच्या अपार जिद्दीने वास्तू उभी राहीली असेल तर बहूधा
कर्जबोजा आणि साठविलेली पुंजी वास्तुच्या निर्मितीत गेली असल्याने नव्या
वास्तूत समस्त कुटुंबाच्या हौशीमौजीला मोठ्या प्रमाणात मर्यादा पडतात. कमावती
व्यक्ती एक असल्यास हे विशेष जाणवते.

- नवी वास्तू ब‍र्याच वेळा मूळ ठिकाणापासून लांब बांधली जाते. वाड्यातून
अपा‍र्टमेंट किंवा, भाड्याच्या ब्लॉकमधून बंगला वगैरे वगैरे. अशावेळेस आपण एका
सामाजिक वर्तूळातून बाजूला पडतो आणि नवीन वर्तूळ तयार व्हायला अनेक कारणांनी
वेळ लागतो.

- जुन्या जागेत अनेक वर्षे अडचणीना तोंड द्यावे लागले असल्यास कुटुंबातल्या
सर्वांच्या स्वभावास वेगवेगळे घट्ट पिळ पडतात. हे पिळ नव्या जागेत सहजा सहजी
सुटत नाहीत.

- नवी वास्तू बांधतांना घरातील एका जरी व्यक्तीचा मनाने सह्भाग नसेल तरी नव्या
वास्तूत मन:स्वास्थ्याला विरजण पडायला वेळ पडत नाही.

ही यादी कदाचित यापेक्षा मोठीही असेल पण मूळ कारणे थोड्याफार तपशीलाच्या फरकाने
हीच असतात. पण लोकांना चमत्काराची अपेक्षा असते. आणि तो घडत नाही म्हणून
पत्रिका बघितली जाते, वास्तूत तोडफोड सूचवली जाते. इतकेच काय, लोक नवे घर
विकायला पण निघतात. माझ्या माहितीतल्या एका आयटी कंपनीच्या मालकाने धंदा वाढावा
म्हणून वास्तूदोष निवारणाचे त‍र्हेत‍र्हेचे उपाय केले पण त्याला आपल्या
कंपनीतील गळकी टॉयलेट्स काही केल्या दिसली नाहीत. असो.

तर मित्रहो तुमच्या परीचयात कुणी वास्तू लाभत नाही म्हणून तक्रार करत असेल तर
त्यांच्या हे मुद्दे जरूर लक्षात आणून द्या...

शुक्रवार, १६ जानेवारी, २००९

नकारात्मक भविष्य का सांगितले जाते?

तमाम ज्योतिषांचे भविष्यकथनाच्या खासियतीप्रमाणे काही ठळक प्रकार सांगता येतात.
काही ज्योतिषी (विशेषत: भारतीय ज्योतिषी) फार ठामपणे बोलतात. भारतीयांचे समूहमन
अनिश्चिततेकडे विशिष्ट नजरेतून बघते. प्रत्येक जीवाच्या आयुष्यातील घटनाक्रम हा
पूर्वनियोजित असतो. हा घटनाक्रम फक्त "ज्ञानी" ज्योतिषाला कुंडलीवरून समजतो,
असा ठाम विश्वास भारतीय जातकांमध्ये असतो. त्यामुळे भारतीय जातक ज्योतिषाकडून
अवाजवी अपेक्षा ठेवतात. मी आज कोणत्या रंगाची अंतर्वस्त्रे घातली आहेत, हे पण
ज्योतिषाने ओळखावे अशी अपेक्षा ठेवली जाते. पुष्कळदा ज्योतिषाच्या कक्षेत न
येणार्‍या समस्या पण ज्योतिषानेच सोडवाव्यात व आपले निर्णय ज्योतिषाने घ्यावे
ही अशीच सर्वत्र अनुभवास येणारी गैरवाजवी अपेक्षा. साहजिक अपेक्षा पूर्ण
करण्याकडे कळत, न-कळत ज्योतिषांचा कल असतो.

याउलट ठराविक काही ज्योतिषी फार गोड बोलतात आणि काही बर्‍याचदा नकारात्मक
बोलतात. पैकी नकारात्मक भविष्यकथनाची कारणमीमांसा करण्याचा हा एक प्रयत्न...

नकारात्मक भविष्यकथन करणार्‍यांचेही दोन गट करता येतील. यातील एक गट हा
गैरहेतूने म्हणजे बहूधा धनाच्या लालसेने जातकाना भीतियुक्त दडपणाखाली ठेऊन
वरचेवर नकारात्मक भविष्य सांगतात. 'चांगले न बोलणार्‍या' ज्योतिषांचा दूसरा गट
आणखी एक गट एका वेगळ्या भूमिकेतून जातकांना सावध करायचे काम करतो. आपण ज्याचा
सल्ला घेतो तो ज्योतिषी कोणत्या गटात मोडतो हे ओळखण्याची जबाबदारी जातकांची
आहे, असे माझे प्रामाणिक मत आहे.

माझं अ-शास्त्रीय (म्हणजे व्यक्तिगत) निरीक्षण असे आहे की नकारात्मक भविष्य
जास्त बरोबर ठरते. याचे महत्वाचे कारण असे की सर्वसाधारणपणे माणसाचा कल हा
विनाशाकडे आहे (Destructive human tendencies surpass cosntructive human
tendencies). कित्येकांना माझे हे विधान पटणार नाही पण संपूर्ण मानवजातीचा
आजवरचा इतिहास हेच सांगतो. प्रगत असो अथवा अप्रगत मानवसमाजाचे अस्तित्वाचे
प्रश्न, वेदना संख्येने जास्त व गंभीर आहेत. सुखे थोडी आणि दू:खे फार आणि
म्हणूनच मानवी आयुष्यात घडणार्‍या नकारात्मक घटनांचे प्रमाण जास्त आहे. हे झाले
नकारात्मक भविष्यकथनाचे प्राथमिक कारण. आता पूर्णपणे ज्योतिषाच्या चौकटीतून या
प्रश्नाचे उत्तर शोधायचा प्रयत्न करतो...

अतिशय चांगले (बृहत्त्रिकोण, बृहदायत) आणि अतिशय त्रासदायक (बृहच्चौकोन) असे
तुरळक दिसणारे योग (म्हणजे भौमितिक रचना) सोडले सर्वसाधारणपणे पत्रिकेत चांगले
आणि वाईट असे दोन्ही योग असतात. बृहत्त्रिकोण, बृहदायत, व बृहच्चौकोन
असणार्‍या पत्रिकांमध्ये चांगले अथवा वाईट भाकित ठामपणे करता येते. पण अन्य
पत्रिकांमध्ये त्रासदायक योगांचा विचार अगोदर करावा लागतो. त्रासदायक कालावधी
आपण कसा हाताळतो यावर नंतर येणारा भाग्यकारक ग्रहांचा सक्रियतेचा काळ अवलंबून
असतो. एखादी व्यक्ती खड्ड्यात पडली तर ती सावरून उभी राहील की नाही ते खड्डा
किती खोल आहे यावर अवलंबून असते. तसेच त्या व्यक्तीच्या जवळच्या सहवासातील
व्यक्तींचे ग्रह जर पीडित व्यक्तीला परतपरत खड्ड्यात ढकलत असतील म्हणजेच
नकारात्मक प्रतिसाद देत असतील तर मूळ पत्रिकेतील भाग्यकारक ग्रहांची साथ पुरेशी
पडत नाही. साहजिकच भाग्यकारक ग्रहांचे आणि त्यानी केलेल्या योगांचे परिणाम हे
त्रासदायक योगांच्या पार्श्वभूमीवर तपासावे लागतात.

जाता जाता भारतीय ज्योतिषांची एक खोड येते उघड केल्याशिवाय मला राहवत नाही. ती
म्हणजे सूताने स्वर्ग गाठणे. एका पत्रिकेवरून चराचर सृष्टीचे भविष्य सांगायचा
प्रयत्न करतात. यामूळे लोकांच्या अवाजवी अपेक्षा वाढतात. एखाद्या प्रश्नाचा
विचार करताना त्यासंबधित सर्व व्यक्तींच्या सर्व पत्रिका तपासल्याशिवाय कोणतेही
उत्तर देऊ नये. ज्योतिषात वापरल्या जाणार्‍या प्रत्येक तंत्राच्या मर्यादा
सल्ला देण्यापूर्वी जातकांना सांगणे हे प्रत्येक ज्योतिषाचे नैतिक कर्तव्य आहे
असे माझे स्पष्ट मत आहे.