मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०१८

श्री० देवेन्द्र फडणवीस

श्री० देवेन्द्र फडणवीस
मुख्यमंत्री
महाराष्ट्र

स०न०वि०वि०

मंत्रालयात आत्महत्या वाढू लागल्याने नायलॉनच्या जाळ्या बसवण्यात येणार असल्याचे वृत्त आत्ताच म०टा०मध्ये वाचले.
जाळ्या बसवल्या तरीही लोक आत्महत्येचे इतर मार्ग अवलंबू शकतात हे आपल्या लक्षात आले असेलच.

तेव्हा या समस्येचे मूलभूत उत्तर शोधण्याची गरज आहे. व्यवस्थेने हतबल झालेल्या आणि आत्महत्येचे टोक गाठणार्‍या प्रत्येक व्यक्तीमध्ये "विवेक संवर्धनाची" गरज आहे, हे आपल्या अजून कुणीही लक्षात आणून दिले नाही याचे सखेद आश्चर्य वाटले.

यासाठी मंत्रालयात प्रत्येक मजल्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीला "विवेक संवर्धन केंद्र" चालविण्याचे कंत्राट द्यावे. सरकारी व्यवस्थेने वैफल्य आलेल्या प्रत्येक व्यक्तीला वेळीच या केंद्रात पाठविण्यात यावे अशी मी नम्र सूचना करतो.

पुढेमागे देशात सर्व मंत्रालयात अशी "विवेक संवर्धन केंद्रे" उघडता येतील.

कळावे
आपला

राजीव उपाध्ये

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: