गुरुवार, ७ एप्रिल, २०११

पुरूषानो या नव्या कायद्याला( बदलाना ) कडाडुन विरोध करा

आज सकाळ मध्ये विवाह कायद्यातील ब दलांविषयी एक बातमी प्रसिद्ध झाली आहे. या बातमीचा दूवा असा आहे -
http://www.esakal.com/esakal/20110407/5049728020328664240.htm

या नवीन बदलांनूसार स्त्रीला नवर्‍याच्या संपत्तीत थेट वाटा द्यावा असे सूचविण्यात आले आहे. लग्नाच्या वेळेला नवर्‍याच्या नावावर असलेल्या संपत्तीत वाटा घटस्फोटित पत्नीला मिळावा अशी ही शिफारस आहे.

हा बदल अजून शिफारस या पातळीवर असल्याने शयातील त्रुटींवर चर्चा निश्चितच होईल. आपल्या कडे कायदे करताना त्यांचा दूरूपयोग होणार नाही याची काळजी घेतली जाते का? या बद्द्ल मी साशंक आहे.

हे संभाव्य बदल पुरुषांचा घात करणारे आहेतच पण त्यामूळे उपस्थित हॊणारे प्रश्न असे आहेत -

० हा कायदा जरी शोषित स्त्रीयांना डोळ्यासमोर ठेवून केला असला तरी मुकत स्त्रीया याचा गैरफायदा घेऊ शकतात. केवळ संपत्तीच्या हव्यासापोटी ३-४ लग्न करणार्‍या स्त्रियांची अनेक उदाहरणे ऐकायला मिळतात. या प्रकारामध्ये या प्रस्तावित बदलामुळे वाढ होईल. एवढेच नाही तर संपत्ती बळकवण्यासाठी खोट्या धमक्या देण्याचे प्रकारही वाढतील. नुकत्याच पुण्यात झालेल्या एकाच कुटुंबातील सर्वांच्या आत्महत्येची आठवण ताजी असेल.

० वडलांच्या संपत्तीत समान वाटा असताना घटस्फोटीत नवर्‍याच्या संपत्तीत वाटा देणे म्हणजे पुरूषांना केवळ ओरबाडणे हाच कायद्याचा हेतू आहे.
० लग्नाच्या वेळेला स्त्रीच्या नावावर असलेल्या संपत्तीची अशी समान वाटणी झालेली मुक्त स्त्रीयांना चालेल का?
० या प्रस्तावित बदलांना माझ्या दृष्टीने एकच उतारा आहे - तो म्हणजे विवाहपूर्व लिखित करार करणे. त्याला दूर्दैवाने अजून कायदेशीर मान्यता नाही

पुरूषानो या नव्या कायद्याला( बदलाना ) कडाडुन विरोध करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: