शुक्रवार, १ फेब्रुवारी, २००८

सूर्य ग्रहण - दिनांक ७ फेब्रुवारी २००८


सूर्य ग्रहण - दिनांक ७ फेब्रुवारी २००८

दिनांक ७ फेब्रुवारी रोजी २००८ या वर्षातील १ले सूर्य ग्रहण असून ते सायन कुंभ राशिमध्ये होत असून ते १७-४० अंशावर होत आहे. निरयन राशिचक्राप्रमाणे ते २२-५० अंशावर मकर राशिमध्ये पडत आहे. हे ग्रहण फक्त दक्षिण गोलार्धात दिसणार असून सोबतच्या आकृतीमध्ये ग्रहणाचा मार्ग दाखविला आहे.

भारतीय समाजात अमावस्या आणि पौर्णिमा या खगोलशास्त्रीय घटनांना असाधारण मह्त्त्व आहे। अमावस्या ही काळोखी असल्यामुळे अशुभ आणि पौर्णिमा ही शुभ्र चंद्रप्रकाशामुळे शुभ अशी एक भाबडी समजुत आपल्या सर्वांच्या मनात घर करून असते। पण शुभ आणि अशुभाच्या कल्पना संस्कृतीजन्य असतात। वास्तविक अमावस्येला चंद्र भ्रमणाचे एक आवर्तन संपून दूसरे चालू होते। पौर्णिमेला या आवर्तनाचा परमोच्च बिन्दु येतो - कारण चंद्र,पृथ्वी आणि रवि एकमेकांशी १८० अंशाचा कोन म्हणजेच प्रतियुती करतात. म्हणजेच अमावस्या एक नवी सुरुवात असते. केवळ निशाचरांना प्रिय म्हणून अमावस्या वाईट मानणार्‍यांनी हे लक्षात घ्यावे की रात्रीच्या काळोखात सृष्टीतील बहुसंख्य जीवांचे सर्जनाचे, श्रमपरिहाराचे कार्य चालते. त्याकडे दूर्लक्ष करून केवळ प्रकाशाला मानवी मनात अतिशय मह्त्त्व असल्याने प्रतिपदा हा आरंभबिंदू आणि म्हणुन ती शुभ मानणे माझ्यामते हा शुद्ध मूर्खपणा आहे.

हे सर्व लिहिण्याचे कारण असे की आधुनिक ज्योतिषात सर्व अमावस्या अशुभ नसतात आणि सर्व पौर्णिमा शुभ नसतात. असो.

या ग्रहणाची कुंडली मांडली असता हे ग्रहण गोचर नेपच्युनशी जोरदार युती करत आहे. याशिवाय हे ग्रहण गोचर मंगळाशी नवपंचम योग करत असून मंगळाचे प्लुटॊ आणि हर्षल या दोन ग्रहांबरोबर प्रतियुति आणि केन्द्र योग करत आहे. हे सर्व योग फलिताच्या दृष्टीने महत्त्वाचे असून सर्वसाधारणपणे आयुष्यात मोठी स्थित्यंतरे दाखवतात. सायन कुंभ, सिंह, वृषभ या राशीमध्ये ज्यांच्या पत्रिकेत १५ ते १८ अंशात लग्न, दशमभाव आरंभबिंदू, चंद्र व रवि आणि या ग्रहांचे शनी, हर्षल, नेपच्यून, प्लुटो या ग्रहांशी अंशात्मक युती, प्रतियुती, केंद्र, अर्धकेंद्र योग होत असतील अशा व्यक्तीना या ग्रहणाची त्रासदायक फळे अनुभवास येउ शकतात. लग्न, दशमभाव आरंभबिंदू, चंद्र व रवि यांनी केलेल्या योगांच्या प्रतीनुसार हे अनुभव कमी जास्त प्रमाणात येतात.

या ग्रहणात ठळकपणे गुंफले गेलेले मंगळ, हर्षल आणि प्लुटॊ हे ग्रह उर्जेच्या विविध रुपांचे प्रतिक आहेत. तर नेपच्यून हा ग्रह कमकुवतपणा आणणारा आणि वास्तवाचे भान सोडायला लावणारा ग्रह आहे. या गोचर ग्रहांचे कुंडलीतील ग्रहांशी होणारे योग - विशेषत: युती, प्रतियुती आणि केंद्र, नवपंचम - फलिताच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात.

पण ही अमावस्या पूर्णपणे अशुभ आहे का? या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे ज्यांच्या पत्रिकेमध्ये १५ ते १८ अंशात लग्न, दशमभाव आरंभबिंदू, चंद्र, रवि, बुध, शुक्र, गुरु हे ग्रह सायन कुंभ, मिथुन आणि तूळ राशीत असून नवपंचम अथवा लाभयोग करत असतील तर हे ग्रहण शुभ ठरण्याची शक्यता आहे.

















1 टिप्पणी:

प्रशांत म्हणाले...

I would like to discuss about an important event during the solar eclipse discussed in this post. please email me on pumanohar@gmail.com