शनिवार, २ फेब्रुवारी, २००८

<< श्री. अच्युत गोडबोले यांस>>

श्री. अच्युत गोडबोले यांस,
स. न. वि. वि.

आपले दि. २३ डिसेंबर २००७ च्या लोकसत्तेमध्ये प्रसिद्ध झालेले 'वेगळे एन आर आय'
या शीर्षकाखालील लिखाण वाचले
(http://www.loksatta.com/daily/20071223/lr01.htm). तुमच्या (आणि
तुमच्याविषयीच्या) बर्‍याच लिखाणातून तुम्ही वारंवार, एसेस्सी बोर्डापासून ते
युनिव्हर्सिटी आणि आयायटी पर्यंत अनेक रॅन्क्स आणि पदकं मिळवून अमेरीकेत
स्थायिक न झाल्याचा उल्लेख येतो. याशिवाय आपण कितीवेळा परदेश प्रवास केलात याचा
पण उल्लेख बर्‍याच वेळा येतो. ९४-९५ च्या सुमारास वाचलेल्या एका लेखात आपला
परिचय '५२ वेळा परदेशप्रवास केलेले' असा होता. २३ डिसेंबर २००७ च्या लेखात
तुमचा परदेशप्रवास १००-१५० वेळा झाला असल्याचा उल्लेख आहे.

या गोष्टीचा मुद्दाम निर्देश करण्याचे कारण असे अमुक अमुक इतक्या वेळा
परदेशप्रवास करणारे, एसेस्सी बोर्डापासून ते युनिव्हर्सिटी आणि आयायटी पर्यंत
अनेक रॅन्क्स आणि पदकं मिळवून अमेरीकेत स्थायिक न होणारे श्री. अच्युत गोडबोले
असा उल्लेख मनात फक्त आता किळस निर्माण करतो. वास्तविक आयायटी मध्येच असे
असंख्य ईश्वराचे लाडके पुत्र दरवर्षी निर्माण होतात. पण कुणीही आपण केलेल्या
परदेशवार्‍यांची अशी स्वत:च जाहिरात
केल्याचे ठाऊक नाही. मी ज्यांच्याकडे ध्रुपद गायकीची ओळख करून घेतली त्या
श्री. उदय भवाळकरांनी परदेशात अनेकवेळा सवाइगंधर्वमहोत्सवापेक्षा झगमटात
अनेकपट मोठ्या आणि आळंदीला मानवीविष्ठेच्या घमघमाटात वारकर्‍यांसारख्या
अडाणी, अशा दोन टोकांच्या श्रोतृवर्गापुढे, तितक्याच तल्लिन्तेने गायन केले
आहे. पण ते कधिही याचा बडेजाव मिरवताना पाहिले नाही.

अशी अनेक उदाहरणे या ठिकाणी देता येतील. या गोष्टीची आपण गंभीर दखल घ्यावी ही
विनंति...

आपला

राजीव उपाध्ये

1 टिप्पणी:

अमोल केळकर म्हणाले...

वा ! विचार पटले !!!